शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबरवाच्या पुनर्वसनासाठी आदिवासींचा पुढाकार

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागांतर्गत अंबाबरवा या गावाच्या पुनर्वसनासाठी आदिवासींनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

प्रधान सचिवांची भेट : १८ वर्षांवरील व्यक्तीला प्रत्येकी १० लाख रुपये मोबदलाअमरावती : महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागांतर्गत अंबाबरवा या गावाच्या पुनर्वसनासाठी आदिवासींनी स्वत: पुढाकार घेतला आहे. ‘स्वच्छेने पुनर्वसन’ हा प्रयोग आता मेळघाटात रुजू लागला आहे.१७ एप्रिल १९९७ रोजी अंबाबरवा जंगल परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. अंबाबरवा गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय ३ नोव्हेंबर २०१२ रोजी करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका व अकोला जिल्ह्यातील काही भाग मिळून अंबाबरवा अभयारण्य क्षेत्र आहे. अंबाबरवाचे पुनर्वसन करण्यापूर्वी ३ मे रोजी गावातील २९८ लाभार्थ्यांना बँकेचे पासबूक देण्यात आले. अकोट येथे ग्रामस्थांना जाणे गैरसोयीचे होत असल्याने बँकेची चमू थेट गावात पोहचली. गावकरांना प्रमाणपत्र व पासबूकचे वाटप सभापती पांडुरंग हागे, जिल्हा परिषद सदस्य वासुदेव गावंडे, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दातीर, नलिनी गावंडे, अकोटचे वन्यजीव उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहायक वनसंरक्षक विनोद डेहनकर, वनपरिक्षेत्रधिकारी काझी, ग्राम परिसर समितीचे सागर सिंग आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनर्वसन अंतर्गत १५ मे राजी अंबाबरवा गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पुनर्वसन अंतर्गत १८ वर्षांवरील व्यक्तिला कुटुंब सदस्य समजून प्रत्येकी १० लाख रुपये तर जमिनीला चर पट मोबदला मिळणार आहे. चार पट मोबदला मिळणारे अंबाबरवा हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पहिले गाव आहे. शासनाने पुनर्वसनासाठी ४० कोटींचा निधी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंबाबरवा येथील पुनर्वसित होणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भिलावा, पावरा, बारेला, राठ्या, निहाल व कोरकू या आदिवासी जमातीचा समावेश आहे. पुनर्वसन झाल्यानंतर गावकरी आपल्या इच्छित स्थळी जातील. पुनर्वसित गावकऱ्यांना कोणतेही प्रशासकीय अथवा इतर अडचणी येवू नये, यासाठी पुनर्वसनाचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्याकरिता जळगाव जामोदचे आमदार संजय कुंटे यांनी मोलाचबी भूमिका बजवाल आहे. अंबाबरवा गावाला १० मे रोजी प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी भेट देवून गावकरांनी संवाद साधून पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट केली. आतापर्यत कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्णी, धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, सोमठाणा (बु), सोमठाणा (खु), केलपाणी व चुनखडी असे एकूण १५ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. गुगामल व सिपना वन्यजीव विभागातील १८ गावांचे पुनर्वन निधीअभावी रखडले आहे. (प्रतिनिधी)