शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या होळीवर आर्थिक संकट

By admin | Updated: March 11, 2017 00:17 IST

मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण दिवाळीसारख्या अत्यंत महत्वाचा सण असतो.

विवंचना : रोहयोची मजुरी आणि शेतमालाची रक्कम थकीत, उत्सवावर सावटश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण दिवाळीसारख्या अत्यंत महत्वाचा सण असतो. लहान बालकापासून युवक-युवती व वृद्धांमध्ये या सणाची प्रतीक्षा असते. उपजिविकेसाठी परप्रांतात गेलेले आदिवासी होळीनिमित्त परत आपल्या गावी येतात. आनंद आणि उत्साहात होळी सण कुटुंबांसह साजरा करतात. गेल्या ४-५ वर्षापासून सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थिती यावर्षी नसली तरी आपल्या शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याने व विकलेल्या शेतमालाचे पैसे हातात न पडल्याने यंदाची होळीवरही आर्थिक संकटाने विरजन आणल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेत गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या कामाचाही मोबदला मिळाला नसल्याने होळी सण कसा साजरा करावा, या चिंतेत आदिवासी बांधव सापडला आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आदिवासींची होळीसाठी शुक्रवारी धारणीत आठवडी बाजारात अत्यल्प हजेरी होती. आदिवासी बांधवांसाठी आपली दुकाने थाटून बसलेले दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसल्याचे चित्र होते. कपडे, भांडी, मणीयारी, रंग, पिचकारींची दुकानावर गर्दी नव्हती. फक्त बांगळ्या आण बताशे एव्हडेच सामान खरेदी कण्याचे सोपास्कार पार पाडले जात होते. होळीनंतर फगव्याची धूमहोळी जळाल्यानंतर आदिवासी बांधवांचा फगवा उत्सव सुरू होतो. फगवा म्हणजे आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य करीत वर्षभर केलेल्या आत्मीय जणांकडून मागितले जाणारे दाम वसुली करण्याची परंपरा आजही जपली जाते. यात रोख रकमेसह वस्तू व धान्याचा समावेश असतो. मात्र, या परंपरेला भीक मागण्याची परंपरा असल्याचे गृहित धरून मागील २० वर्षांपासून आदिवासी समाज विकास संघटनांनी बंदी आणली आहे. त्यामुळे फगवा मागण्याची प्रथा हळूहळू लोप पावत आहे. हिरव्या होळीने साजरा होणार सणमेळघाटातील प्रत्येक गावात होळीच्या दिवशी हिरव्या रंगाची होळी तयार केली जाते. यात जांभुळाची पाने, पळसाची पाने व फुले, तुरीशी तुरकाठी आणि लाकडांचा समावेश असतो. प्रत्येक गावात दोन होळी तयार करण्यात येते. यादिवशी गावातील पोलीस पाटील आपल्या पत्नीसह होळीची पूजा करून होळीला अग्नी देतात.मेघनाथ, कुंभकर्णाची पूजाहोळीनंतर ४ दिवसांनी येणाऱ्या पंचमीच्या दिवशी मेघनाथाची पूजा केली जाते. हा मेघनाथ म्हणजे वरुणदेवता की रामायणातील रावणाचा पुत्र, याबाबत अनेक मतभेद आजही कायम आहेत. मात्र खाऱ्या, टेंभरू या गावात मेघनाथाला लागूनच कुंभकर्णाचीही पूजा पंचमीच्या दिवशी केली जाते. त्यावरून मेघनाथाचा संबंध रामायण काळातील असल्याचे लक्षात येते. मेघनाथाची पूजा तालुक्यातील खाऱ्या टेंभरू, पाटिया, पोटीलावा, कारा, दाबिदा येथे पंचमीच्या दिवशी मोठ्या आनंद व उत्साहाने करण्यात येते.