शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वे, एसटीत तुडूंब गर्दी

By admin | Updated: May 11, 2014 22:50 IST

केंद्र शासनाच्या टपाल विभागाच्यावतीने रविवारी विविध पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे केंद्रस्थळी पोहोचण्यासाठी परीक्षार्थांनी रेल्वे गाड्या आणि एसटीने जाणे पसंत केले.

अमरावती : केंद्र शासनाच्या टपाल विभागाच्यावतीने रविवारी विविध पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे केंद्रस्थळी पोहोचण्यासाठी परीक्षार्थांनी रेल्वे गाड्या आणि एसटीने जाणे पसंत केले. मात्र रेल्वे, एसटीत एकच गर्दी उडाल्याने परीक्षार्थ्यांचे हाल झाले. तरीदेखील परीक्षेला जाण्याची जिद्द ही लक्ष वेधणारी ठरली. टपाल विभागाच्यावतीने पोस्टल सहायक, शॉर्र्टिंग सहायक, पोस्टल सहायक (बचत बँक) अशा विविध जागांसाठी सुमारे एक हजार पदभरतीसाठी राज्यभरात रविवारी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी लाखो परीक्षार्थ्यांनी आवेदन भरले होते. त्यानुसार विदभातर््ाील परीक्षार्थ्यांसाठी नागपूर हे लेखी परीक्षेचे केंद्र टपाल विभागाने निश्चित केले. एकाच वेळी रविवारी दुपारी २ ते ४ या दरम्यान लेखी परीक्षेचा वेळ निश्चित असल्याने नागपूर येथे जाण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानक, बडनेरा रेल्वे स्टेशनवर सकाळी ७ ते ९ या कालावधीत जणू यात्रेचे स्वरुप आले होते. विशेषत: परीक्षार्थी मुली, महिलांसोबत त्यांच्या नातेवाईकांनाही नागपूरकडे प्रवास करताना अनेक हालअपेष्टा सहन करीत नागपूर गाठावे लागले, हे वास्तव आहे. या पद भरतीबाबत राज्य परिवहन विभागाला पूर्व कल्पना नसल्याने नागपूरकडे वेळेवर जादा बसेस सोडता आल्या नाही, अशी माहिती बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सी. बी. यादव यांनी दिली. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उसळलेली गर्दी बघता परीक्षार्थ्यांना नागपूरकडे जाण्याकरिता प्राधान्य देण्यासाठी आगार व्यवस्थापक नीलेश बेलसरे, बसस्थानक प्रमुख अभय बिहुरे यांनी मोलाची भूमिका बजावली.