शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

ब्रिटिशकालीन लोहा भंगारातून साकारले तीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ्री-टाईप स्टील-ट्रस’ पद्धतीचे होते. तसेच पेढी नदीच्या पुलावर कास्ट आयर्नचे ओतीव असे सुरेख रेलींग होते.

ठळक मुद्दे‘जुनं ते सोनंच’: सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्तुत्य उपक्रम, तीनही पूल ठरले लोकोपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ब्रिटिशकालीन लोखंडाच्या भंगारातून जिल्ह्यात साकारल्या गेलेल्या तीन पुलांनी ‘जुनं ते सोनंच’ यावर शिक्कामोर्तब केले आहे. १३७ वर्षे जुने हे भंगार आहे. या भंगाराच्या वापरामुळे १७ वर्षांपूर्वी २ कोटी ६० लाखांची बचत झाली आहे.अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ्री-टाईप स्टील-ट्रस’ पद्धतीचे होते. तसेच पेढी नदीच्या पुलावर कास्ट आयर्नचे ओतीव असे सुरेख रेलींग होते.२००१-२००२ मध्ये या पुलांच्या रूंदीकरणासह मजबुतीकरणाचा विचार पुढे आला. यात पिली आणि पूर्णा नदीवरील पुलावर ३०० टन जुने ब्रिटिशकालीन भंगार लोखंड निघाले.आसेगावलगतच्या पूर्णा नदीवरील पुलावरील काढल्या गेलेल्या २६.३० मीटर लांबीच्या सात लोखंडी गाळ्यांपैकी सहा लोखंडी गाळ्यांचा वापर, मेळघाटातील कळमखार गावाजवळील गडगा नदीवरील नव्या मोठ्या पुलाचे बांधकामाकरिता २००२-२००३ मध्ये केल्या गेला. यात २ कोटी ६० लाख रुपये अपेक्षित खर्चाचा हा पूल केवळ ५५ लाखांत बांधल्या गेला. केवळ सहा महिन्यांत, सहा गाळ्यांचा १५६ मीटर लांबीचा आणि ४.२५ मीटर रुंदीचा हा अस्तित्वात आलेला पूल आजही सुस्थितीत आहे.पिली नदीवरील पुलावरील काढल्या गेलेल्या २५.३० मीटर लांबीच्या तीन लोखंडी गाळ्यांपैकी एक लोखंडी गाळा, पोहरा मार्गावरील भानखेडा (खुर्द) गावाजवळ खोलाड नदीवरील पुलाच्या बांधकामात वापरण्यात आला आहे. यात ३८ लाख अपेक्षित खर्चाचा हा पूल केवळ १३ लाख रुपयांत पूर्ण झाला. उर्वरित दोन गाळ्यांचा वापर वरूड तालुक्यातील ग्रामीण मार्गावर वावरूळी गावाजवळील नदीवरील पुलाच्या बांधकामात करण्यात आला आहे. यात ३५ लाखांची बचत झाल्याची माहिती आहे.पेढी नदीवरील जुन्या पुलाच्या पॅरापेटचे निघालेले ओतीव रेलींग, अमरावती येथील विश्रामभवनाच्या आवार भिंतीला लावल्या गेले. त्यातून निघालेल्या दगडांचा वापर आवाराचे मुख्य प्रवेशद्वारात वापरले गेले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता धनंजय धवड, तत्कालीन कार्यकारी अभियंता एन. अ‍े. मर्चंट व व्ही. बी. साळवे यांची व त्यांचे अधिनस्त उपविभागीय तसेच शाखा अभियंत्यांची कल्पकता यात उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या या कल्पकतेमुळे ब्रिटिशकालीन जुन्या ऐतिहासिक आठवणींचा ठेवा आजही शाबूत आहे. ब्रिटिशकालीन त्या भंगार लोखंडाला सोन्याचे मूल्य प्राप्त झाले आहे. १७ वर्षांपूर्वी वेळ आणि पैशाची बचत करीत जुन्या आणि नव्या संस्कृतीचा समन्वय साधत पूर्णत्वास नेल्या गेलेले हे तीनही पूल आजही लोकोपयोगी ठरले आहेत.