शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन लोहा भंगारातून साकारले तीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ्री-टाईप स्टील-ट्रस’ पद्धतीचे होते. तसेच पेढी नदीच्या पुलावर कास्ट आयर्नचे ओतीव असे सुरेख रेलींग होते.

ठळक मुद्दे‘जुनं ते सोनंच’: सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्तुत्य उपक्रम, तीनही पूल ठरले लोकोपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ब्रिटिशकालीन लोखंडाच्या भंगारातून जिल्ह्यात साकारल्या गेलेल्या तीन पुलांनी ‘जुनं ते सोनंच’ यावर शिक्कामोर्तब केले आहे. १३७ वर्षे जुने हे भंगार आहे. या भंगाराच्या वापरामुळे १७ वर्षांपूर्वी २ कोटी ६० लाखांची बचत झाली आहे.अमरावती जिल्ह्यातील अमरावती-अचलपूर-धारणी-बऱ्हाणपूर हा जुना मोगलकालीन व नंतर ब्रिटिशकालीन महत्त्वाचा रस्ता. या मार्गावर पेढी, पूर्णा आणि पिली नामक मोठ्या नद्यांवर ब्रिटिशांनी १८८३ मध्ये पूल बांधलेत. यात पूर्णा आणि पिली नदीवरील हे पूल सुपरस्ट्रक्चर ‘थ्री-टाईप स्टील-ट्रस’ पद्धतीचे होते. तसेच पेढी नदीच्या पुलावर कास्ट आयर्नचे ओतीव असे सुरेख रेलींग होते.२००१-२००२ मध्ये या पुलांच्या रूंदीकरणासह मजबुतीकरणाचा विचार पुढे आला. यात पिली आणि पूर्णा नदीवरील पुलावर ३०० टन जुने ब्रिटिशकालीन भंगार लोखंड निघाले.आसेगावलगतच्या पूर्णा नदीवरील पुलावरील काढल्या गेलेल्या २६.३० मीटर लांबीच्या सात लोखंडी गाळ्यांपैकी सहा लोखंडी गाळ्यांचा वापर, मेळघाटातील कळमखार गावाजवळील गडगा नदीवरील नव्या मोठ्या पुलाचे बांधकामाकरिता २००२-२००३ मध्ये केल्या गेला. यात २ कोटी ६० लाख रुपये अपेक्षित खर्चाचा हा पूल केवळ ५५ लाखांत बांधल्या गेला. केवळ सहा महिन्यांत, सहा गाळ्यांचा १५६ मीटर लांबीचा आणि ४.२५ मीटर रुंदीचा हा अस्तित्वात आलेला पूल आजही सुस्थितीत आहे.पिली नदीवरील पुलावरील काढल्या गेलेल्या २५.३० मीटर लांबीच्या तीन लोखंडी गाळ्यांपैकी एक लोखंडी गाळा, पोहरा मार्गावरील भानखेडा (खुर्द) गावाजवळ खोलाड नदीवरील पुलाच्या बांधकामात वापरण्यात आला आहे. यात ३८ लाख अपेक्षित खर्चाचा हा पूल केवळ १३ लाख रुपयांत पूर्ण झाला. उर्वरित दोन गाळ्यांचा वापर वरूड तालुक्यातील ग्रामीण मार्गावर वावरूळी गावाजवळील नदीवरील पुलाच्या बांधकामात करण्यात आला आहे. यात ३५ लाखांची बचत झाल्याची माहिती आहे.पेढी नदीवरील जुन्या पुलाच्या पॅरापेटचे निघालेले ओतीव रेलींग, अमरावती येथील विश्रामभवनाच्या आवार भिंतीला लावल्या गेले. त्यातून निघालेल्या दगडांचा वापर आवाराचे मुख्य प्रवेशद्वारात वापरले गेले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता धनंजय धवड, तत्कालीन कार्यकारी अभियंता एन. अ‍े. मर्चंट व व्ही. बी. साळवे यांची व त्यांचे अधिनस्त उपविभागीय तसेच शाखा अभियंत्यांची कल्पकता यात उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या या कल्पकतेमुळे ब्रिटिशकालीन जुन्या ऐतिहासिक आठवणींचा ठेवा आजही शाबूत आहे. ब्रिटिशकालीन त्या भंगार लोखंडाला सोन्याचे मूल्य प्राप्त झाले आहे. १७ वर्षांपूर्वी वेळ आणि पैशाची बचत करीत जुन्या आणि नव्या संस्कृतीचा समन्वय साधत पूर्णत्वास नेल्या गेलेले हे तीनही पूल आजही लोकोपयोगी ठरले आहेत.