शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूचा फैलाव

By admin | Updated: September 1, 2015 23:59 IST

तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे.

रुग्णांवर नागपुरात उपचार : वरुड तालुक्यातील सरकारीसह खासगी रुग्णालयात गर्दीसंजय खासबागे  वरुडवरुड : तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे. मलेरीया, हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. वरुड येथील एक रुग्ण स्वाईनफ्ल्यू च्या आजाराने तर राजूराबाजारचा एक रुग्ण डेंग्यूमुळे नागपूरात उपचार घेत आहे. वरुड तालुक्यात पुसला, राजूराबाजार, आमनेर,लोणी, शेंदूरजनाघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरुड येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून याव्यतिरिक्त खासगी रुग्णालये आहे. गेल्या चार दिवसात तीन लोकांचा तापाने मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात पाचशेपेक्षा अधिक तर प्राथमिक स्वास्थ केंद्रात सुध्दा शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहे. वरुड शहरातील एक रुग्ण नागपूरला स्वाईनफ्ल्यूच्या आजारावर उपचार घेत आहे. राजूराबाजारचा रुग्ण डेंग्य तापाने त्रस्त असल्योन नागपूरातच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.यामुळे शहरीत आणि ग्रामीण स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. शेणखताचे उकीरडे, तुंबलेल्या नाल्या, साचलेले डबके तसेच गांजरगवत , झूडूपे वाढलेली आहे. यामुळेच डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अ‍ॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद, तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टीकच्या वस्तू ची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावा. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी. ताप आल्यास आरोग्य केंद्रात जातालुक्यात वातावरणीय बदलानुसार ताप, हिवताप तसेच डायरियासारखे आजार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य कायम आहे. नाल्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास साथीच्या आजाराचा फैलाव वाढू शकतो. नागरिकांना ताप आल्यास तातडीने आरोग्य केंद्रात संपर्कसाधून उपचार करावे. तसेच डॉक्टरांनी दिलेला औषधीचा पूर्ण डोज घ्यावा. घराशेजारी तणनाशकाची फवारणी करण्यात यावी, साचलेले डबके आणि टाकावू वस्तूचा विल्हेवाट लावल्यास डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, असे तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख यांनी सांगितले.ग्रामीण, शहरी भागात घाणीचे साम्राज्य ग्रामीण आणि शहरी भागात घाणीचे साम्राज्य कायम असल्याने नागरिकांच्या जिवाशी स्थानिक प्रशासनाचा खेळ सुरू आहे. प्राथमिक उपाययोजना ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेने केल्यास रोगराई पसरणार नसल्याचे नागरिक बोलत आहेत.