शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूचा फैलाव

By admin | Updated: September 1, 2015 23:59 IST

तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे.

रुग्णांवर नागपुरात उपचार : वरुड तालुक्यातील सरकारीसह खासगी रुग्णालयात गर्दीसंजय खासबागे  वरुडवरुड : तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे. मलेरीया, हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. वरुड येथील एक रुग्ण स्वाईनफ्ल्यू च्या आजाराने तर राजूराबाजारचा एक रुग्ण डेंग्यूमुळे नागपूरात उपचार घेत आहे. वरुड तालुक्यात पुसला, राजूराबाजार, आमनेर,लोणी, शेंदूरजनाघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरुड येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून याव्यतिरिक्त खासगी रुग्णालये आहे. गेल्या चार दिवसात तीन लोकांचा तापाने मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात पाचशेपेक्षा अधिक तर प्राथमिक स्वास्थ केंद्रात सुध्दा शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहे. वरुड शहरातील एक रुग्ण नागपूरला स्वाईनफ्ल्यूच्या आजारावर उपचार घेत आहे. राजूराबाजारचा रुग्ण डेंग्य तापाने त्रस्त असल्योन नागपूरातच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.यामुळे शहरीत आणि ग्रामीण स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. शेणखताचे उकीरडे, तुंबलेल्या नाल्या, साचलेले डबके तसेच गांजरगवत , झूडूपे वाढलेली आहे. यामुळेच डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अ‍ॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद, तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टीकच्या वस्तू ची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावा. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी. ताप आल्यास आरोग्य केंद्रात जातालुक्यात वातावरणीय बदलानुसार ताप, हिवताप तसेच डायरियासारखे आजार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य कायम आहे. नाल्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास साथीच्या आजाराचा फैलाव वाढू शकतो. नागरिकांना ताप आल्यास तातडीने आरोग्य केंद्रात संपर्कसाधून उपचार करावे. तसेच डॉक्टरांनी दिलेला औषधीचा पूर्ण डोज घ्यावा. घराशेजारी तणनाशकाची फवारणी करण्यात यावी, साचलेले डबके आणि टाकावू वस्तूचा विल्हेवाट लावल्यास डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, असे तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख यांनी सांगितले.ग्रामीण, शहरी भागात घाणीचे साम्राज्य ग्रामीण आणि शहरी भागात घाणीचे साम्राज्य कायम असल्याने नागरिकांच्या जिवाशी स्थानिक प्रशासनाचा खेळ सुरू आहे. प्राथमिक उपाययोजना ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेने केल्यास रोगराई पसरणार नसल्याचे नागरिक बोलत आहेत.