शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

पणन महासंघाचे केंद्र कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 13, 2017 00:06 IST

कधीकाळी वैभव असणाऱ्या पणन महासंघाची आज रोजी दयनीय अवस्था झाली असून ...

हमीभावात वाढ होण्यासाठी प्रयत्न व्हावे : चार महिन्यांत एकही शेतकरी फिरकला नाही!अमरावती : कधीकाळी वैभव असणाऱ्या पणन महासंघाची आज रोजी दयनीय अवस्था झाली असून पणन महासंघाच्या जिल्हाभरातील केंद्रावर गत चार महिन्यापासून एकही शेतकरी फिरकला नाही. जिल्ह्यात केंद्रावर उद्घाटनापासून एकरी किलो कापसाची खरेदी सुद्धा गत चार महिन्यापासून झाली नाही. पणन महासंघापेक्षा खुल्या बाजारात कापसाला मिळणारा भाव जास्त असल्याने ही परिस्थिती पणन महासंघावर ओढवली आहे. शेतमाल उत्पादक खर्च व शेतमाल तयार झाल्यानंतरही विक्रीपर्यंतचा खर्च याचा हिशेब केल्यास शेतमालास मिळणारा हमीभाव कमीच आहे. त्यातच इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्तच असते. मात्र खर्च वाढला असताना दरवर्षी नगण्य अशी फक्त ५० रूपये प्रति क्विंटल हमीभावात वाढ होत आहे. आज रोजी पणन महासंघाकडून सर्वात उच्च प्रतिच्या कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल असा हमीदर दिला जात आहे. कापसाला किमान हमीदर मिळावा, यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी हमीदराने कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. तसेच या केंद्रावरील आवक पाहता जिल्ह्यातील इतर तालुक्यातही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होती. मात्र या केंद्रावर गत चार महिन्यांपासून एकाही शेतकऱ्याने आपला कापूस विकण्यासाठी आणला नाही. परिणामी या केंद्रावर गत चार महिन्यात एक किलोही कापूस खरेदी झाला नाही. उद्घाटनालाही सुद्धा या केंद्रावर कापूस नव्हता उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीदरात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने विकण्यापेक्षा घरात पडून असलेला बरा अशी मानसिकता शेतकऱ्यांची आहे. हमीभावात कापूस मिळत नसल्याने जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव कमी असताना देखील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना हमी दरापेक्षा जास्तच भाव देऊन कापसाची खरेदी करावी लागत आहे त्यामुळे खुल्या बाजारात आजमितीला कापूस ५५०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटलने विकल्या जात आहे. पणन महासंघाचे भाव कमीच आहेत. अल्पभूधारकांनी कापूस पीक लागवडीला फाटा दिला तर सधन व बागायती शेतकऱ्यांकडूनच कापसाची लागवड केली जात आहे. परिणामी कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याची ही ओळख हळूहळू संपत आहे. शासनाने उत्पादन खर्चाचा विचार करता कापसाचे हमीदर वाढवावे, अशी मागणी आहे.जिल्ह्यात पाच केंद्र कापूस पणन महासंघाचे जिल्ह्यात पाच कापूस खरेदी केंद्र आहेत. यामध्ये तिवसा, वरूड, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, आदी ठिकाणी सध्याही कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. मात्र मागील नोव्हेबर महिन्यापासून या पाचही ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर काटा पूजनावरच खरेदी केंद्र स्थिरावले आहेत. मात्र कापूसाचा बोंडही विक्रीस आला नाही.पणन महासंघाची पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्र आहेत. मात्र केंद्र सुरू झाल्यापासून कापूस विक्रीला आलाच नाही. कारण शासकीय दरापेक्षा खासगीकडे अधिक भाव मिळत आहे. त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असल्याचे समाधान आहे- छाया दंडाळे, संचालक पणन महासंघ