शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाचे केंद्र कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 13, 2017 00:06 IST

कधीकाळी वैभव असणाऱ्या पणन महासंघाची आज रोजी दयनीय अवस्था झाली असून ...

हमीभावात वाढ होण्यासाठी प्रयत्न व्हावे : चार महिन्यांत एकही शेतकरी फिरकला नाही!अमरावती : कधीकाळी वैभव असणाऱ्या पणन महासंघाची आज रोजी दयनीय अवस्था झाली असून पणन महासंघाच्या जिल्हाभरातील केंद्रावर गत चार महिन्यापासून एकही शेतकरी फिरकला नाही. जिल्ह्यात केंद्रावर उद्घाटनापासून एकरी किलो कापसाची खरेदी सुद्धा गत चार महिन्यापासून झाली नाही. पणन महासंघापेक्षा खुल्या बाजारात कापसाला मिळणारा भाव जास्त असल्याने ही परिस्थिती पणन महासंघावर ओढवली आहे. शेतमाल उत्पादक खर्च व शेतमाल तयार झाल्यानंतरही विक्रीपर्यंतचा खर्च याचा हिशेब केल्यास शेतमालास मिळणारा हमीभाव कमीच आहे. त्यातच इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्तच असते. मात्र खर्च वाढला असताना दरवर्षी नगण्य अशी फक्त ५० रूपये प्रति क्विंटल हमीभावात वाढ होत आहे. आज रोजी पणन महासंघाकडून सर्वात उच्च प्रतिच्या कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल असा हमीदर दिला जात आहे. कापसाला किमान हमीदर मिळावा, यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी हमीदराने कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. तसेच या केंद्रावरील आवक पाहता जिल्ह्यातील इतर तालुक्यातही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होती. मात्र या केंद्रावर गत चार महिन्यांपासून एकाही शेतकऱ्याने आपला कापूस विकण्यासाठी आणला नाही. परिणामी या केंद्रावर गत चार महिन्यात एक किलोही कापूस खरेदी झाला नाही. उद्घाटनालाही सुद्धा या केंद्रावर कापूस नव्हता उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीदरात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने विकण्यापेक्षा घरात पडून असलेला बरा अशी मानसिकता शेतकऱ्यांची आहे. हमीभावात कापूस मिळत नसल्याने जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव कमी असताना देखील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना हमी दरापेक्षा जास्तच भाव देऊन कापसाची खरेदी करावी लागत आहे त्यामुळे खुल्या बाजारात आजमितीला कापूस ५५०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटलने विकल्या जात आहे. पणन महासंघाचे भाव कमीच आहेत. अल्पभूधारकांनी कापूस पीक लागवडीला फाटा दिला तर सधन व बागायती शेतकऱ्यांकडूनच कापसाची लागवड केली जात आहे. परिणामी कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याची ही ओळख हळूहळू संपत आहे. शासनाने उत्पादन खर्चाचा विचार करता कापसाचे हमीदर वाढवावे, अशी मागणी आहे.जिल्ह्यात पाच केंद्र कापूस पणन महासंघाचे जिल्ह्यात पाच कापूस खरेदी केंद्र आहेत. यामध्ये तिवसा, वरूड, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, आदी ठिकाणी सध्याही कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. मात्र मागील नोव्हेबर महिन्यापासून या पाचही ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर काटा पूजनावरच खरेदी केंद्र स्थिरावले आहेत. मात्र कापूसाचा बोंडही विक्रीस आला नाही.पणन महासंघाची पाच ठिकाणी कापूस खरेदी केंद्र आहेत. मात्र केंद्र सुरू झाल्यापासून कापूस विक्रीला आलाच नाही. कारण शासकीय दरापेक्षा खासगीकडे अधिक भाव मिळत आहे. त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असल्याचे समाधान आहे- छाया दंडाळे, संचालक पणन महासंघ