शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

दुष्काळात बियाणे महागले

By admin | Updated: June 12, 2016 00:01 IST

: सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे.

शेतकऱ्यांचे शोषण : महाबीजच्या बियाण्यांतही ४० टक्क्यांची दरवाढअमरावती : सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे शासनाने बियाणे व खतांच्या किमती स्थिर ठेवण्याची हमी दिली असताना महाबीजने केलेली दरवाढ म्हणजे विश्वासघात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे व अशा स्थितीत महाबीजने बियाण्यांची दरवाढ केली आहे. आतापर्यंत स्वस्त आणि रास्त दरात राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज उपलब्ध करून देत आहे. डाळवर्गीय बियाण्यांच्या किमतीत तब्बल ५० टक्यांनी वाढ केली आहे. महाबीजने या निर्णयामुळे बाजारात सर्वच खासगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे.मागील वर्षीची खरीप व रबीचा हंगाम पावसाअभावी वाया गेला. पेरणीचा खर्च निघाला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने बियाण्यांच्या दरात अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना त्यांच्या पदरी निराशा आली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी महाबीजने नफा कमविण्यासाठी दरवाढ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)डाळवर्गीय बियाण्यात ५० टक्क्यांची दरवाढमागील वर्षीपासून डाळीची किंमत २०० रुपयापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे यंदा शेतकरी डाळवर्गीय पिके अधिक घेणार बाजार डाळवर्गीय बियाण्यांची टंचाई आहे अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांच्या किमती ५० टक्यापर्यंत वाढविल्या आहेत.