शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दुष्काळात बियाणे महागले

By admin | Updated: June 12, 2016 00:01 IST

: सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे.

शेतकऱ्यांचे शोषण : महाबीजच्या बियाण्यांतही ४० टक्क्यांची दरवाढअमरावती : सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे शासनाने बियाणे व खतांच्या किमती स्थिर ठेवण्याची हमी दिली असताना महाबीजने केलेली दरवाढ म्हणजे विश्वासघात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे व अशा स्थितीत महाबीजने बियाण्यांची दरवाढ केली आहे. आतापर्यंत स्वस्त आणि रास्त दरात राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज उपलब्ध करून देत आहे. डाळवर्गीय बियाण्यांच्या किमतीत तब्बल ५० टक्यांनी वाढ केली आहे. महाबीजने या निर्णयामुळे बाजारात सर्वच खासगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे.मागील वर्षीची खरीप व रबीचा हंगाम पावसाअभावी वाया गेला. पेरणीचा खर्च निघाला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने बियाण्यांच्या दरात अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना त्यांच्या पदरी निराशा आली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी महाबीजने नफा कमविण्यासाठी दरवाढ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)डाळवर्गीय बियाण्यात ५० टक्क्यांची दरवाढमागील वर्षीपासून डाळीची किंमत २०० रुपयापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे यंदा शेतकरी डाळवर्गीय पिके अधिक घेणार बाजार डाळवर्गीय बियाण्यांची टंचाई आहे अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांच्या किमती ५० टक्यापर्यंत वाढविल्या आहेत.