शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

संशोधनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन गरजेचा

By admin | Updated: March 9, 2016 00:59 IST

संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

कुलसचिव : विद्यापीठात संशोधन पेपर लिखाणावर कार्यशाळाअमरावती : संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दर्जेदार पध्दतीने संशोधन पेपर लिहिण्यासाठी आयोजित कार्यशाळा ही सुवर्णसंधी ठरली आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी केले.रसायनशास्त्र विभाग व नॅशनल अ‍ॅकेडेमी आॅफ सायन्सेस इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, निसाचे यू.सी. श्रीवास्तव, के.सत्यनारायणा, निरजकुमार, पी.सी. अभिलाष, रसायनशास्त्र विभाग प्रमुख आनंद अस्वार उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय देशमुख म्हणाले, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे संशोधन पेपर लिहिण्यासाठी सैद्धांतिक विचारांसोबत भाषेची मांडणी उत्तमरितीने करता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ही कला अवगत करणे अपेक्षित असून उत्कृष्टपणे लिहिण्यासाठी उत्कृष्ट श्रोता असणेसुध्दा महत्त्वाचे आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते उत्कृष्ट संशोधन पेपर लिहितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी मार्गदर्शन करताना श्रीवास्तव म्हणाले की, कार्यशाळेत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यातून अचुकता येऊन संशोधन पेपर लिहिण्याच्या परिपूर्णतेकडे विद्यार्थी जातील आणि त्यांची उत्कृष्ट लेखनकृती प्रकाशमय होऊन सर्वांपर्यंत पोहोचेल. अध्यक्षीय भाषण माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी केले. ते म्हणाले, राईटिंग व फाईटिंग दोेन्ही गोष्टी अवघड असतात. लिखाणासाठी वैचारिक शक्ती महत्त्वाची आहे. अनेकांना पेपर लिहिण्याची सैद्धांतिक पध्दतीची माहिती असतेच असे नाही, त्यानुषंगाने कार्यशाळा महत्वाचा टप्पा ठरली आहे. यावेळी दिग्रसचे प्राचार्य आगरकर व सोनल बूब या सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत आपल्या मनोगतातून कौतुक केले. प्रास्ताविक विभाग प्रमुख आनंद अस्वार तर संचालन व आभार प्रदर्शन मनीषा कोडापे यांनी केले. कार्यशाळेला देशभरातून २०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत इतरही अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.