शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन गरजेचा

By admin | Updated: March 9, 2016 00:59 IST

संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

कुलसचिव : विद्यापीठात संशोधन पेपर लिखाणावर कार्यशाळाअमरावती : संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दर्जेदार पध्दतीने संशोधन पेपर लिहिण्यासाठी आयोजित कार्यशाळा ही सुवर्णसंधी ठरली आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी केले.रसायनशास्त्र विभाग व नॅशनल अ‍ॅकेडेमी आॅफ सायन्सेस इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, निसाचे यू.सी. श्रीवास्तव, के.सत्यनारायणा, निरजकुमार, पी.सी. अभिलाष, रसायनशास्त्र विभाग प्रमुख आनंद अस्वार उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय देशमुख म्हणाले, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे संशोधन पेपर लिहिण्यासाठी सैद्धांतिक विचारांसोबत भाषेची मांडणी उत्तमरितीने करता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ही कला अवगत करणे अपेक्षित असून उत्कृष्टपणे लिहिण्यासाठी उत्कृष्ट श्रोता असणेसुध्दा महत्त्वाचे आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते उत्कृष्ट संशोधन पेपर लिहितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी मार्गदर्शन करताना श्रीवास्तव म्हणाले की, कार्यशाळेत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यातून अचुकता येऊन संशोधन पेपर लिहिण्याच्या परिपूर्णतेकडे विद्यार्थी जातील आणि त्यांची उत्कृष्ट लेखनकृती प्रकाशमय होऊन सर्वांपर्यंत पोहोचेल. अध्यक्षीय भाषण माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी केले. ते म्हणाले, राईटिंग व फाईटिंग दोेन्ही गोष्टी अवघड असतात. लिखाणासाठी वैचारिक शक्ती महत्त्वाची आहे. अनेकांना पेपर लिहिण्याची सैद्धांतिक पध्दतीची माहिती असतेच असे नाही, त्यानुषंगाने कार्यशाळा महत्वाचा टप्पा ठरली आहे. यावेळी दिग्रसचे प्राचार्य आगरकर व सोनल बूब या सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत आपल्या मनोगतातून कौतुक केले. प्रास्ताविक विभाग प्रमुख आनंद अस्वार तर संचालन व आभार प्रदर्शन मनीषा कोडापे यांनी केले. कार्यशाळेला देशभरातून २०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत इतरही अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.