शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

एसटी प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST

अमरावती : लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सुविधेकरिता एसटी महामंडळाची बस सेवा सुरू आहे. पूर्वी आठशेपेक्षा जास्त बसफेऱ्या व्हायच्या. आता मात्र ...

अमरावती : लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सुविधेकरिता एसटी महामंडळाची बस सेवा सुरू आहे. पूर्वी आठशेपेक्षा जास्त बसफेऱ्या व्हायच्या. आता मात्र फक्त चार ते पाच बस फेऱ्या होत असून, प्रवाशांकडून तीच ती कारणे दिली जात आहेत. कुणाला कोविडमुळे नातेवाईक दगावला असेल, तर अंत्यसंस्काराला जायचे आहे, तर कुणाला नातेवाइकांची प्रकृती चांगली नसल्यामुळे भेटायला जायचे आहे, तर कुणाला पूर्वीच नातेवाइकांचे लग्न जुळले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये लग्नाकरिता प्रवास करायचे आहे, ही कारणे प्रवाशांनी सांगितली. बसमध्ये बसल्यानंतर चालक-वाहकही प्रवाशांना तुम्ही प्रवास कशासाठी करीत आहेत, याची विचारणा करीत आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सॅनिटायझर हातावर देत आहेत. अमरावती मध्यवर्ती आगारातून नागपूर, परतवाडा, वरूड या महत्त्वाच्या मार्गांवर चार ते पाच बसफेऱ्या रोज सोडण्यात येत आहे, तर इतर आगाराच्या नागपूर, अकोला व यवतमाळ येथून काही बस फेऱ्या अमरावतीला येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.

१) जिल्ह्यातील एकूण आगार - ८

२) बसेस चालविल्या जातात - ४

३) रविवारी १७५ प्रवास करणाऱ्यांची संख्या

बॉक्स:

एसटी कर्मचाऱ्यांसोबत वाद

एसटी महामंडळाने फक्त आवश्यक सुविधेकरिता प्रवाशांना परवानगी दिली आहे. मात्र, काही वेळेच इतर प्रवासीसुद्धा प्रवास करीत असताना वाहकाच्या लक्षात येताच तो त्यांना हटकत आहे. त्यामुळे काही नागरिकांना अंत्यसंस्कारला तर कुणाला लग्नाला, तर कुणाला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जायचे असते. त्यामुळे असे प्रवासी थेट वाहकाशी वादसुद्धा घालत आहेत. मात्र, अशा घटना बोटावर मोजण्याइतपतच आहेत.

कोट

सध्या प्रवाशीच नाही. त्यामुळे बसफेऱ्या कमी केल्या असून, रोज फक्त चार ते पाच बस फेऱ्या महत्त्वाच्या मार्गावर सोडण्यात येत आहे. रविवारी प्रवासी संख्या १७५ एवढी होती. त्यातून फक्त अडीच हजाराचे उत्पन्न मिळाले. इतर दिवशीही हीच परिस्थिती आहे.

श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक अमरावती

बॉक्स:

या मार्गावर बस फेऱ्या

अमरावती जिल्ह्यात आठ आगार, तर १४ बसस्थानक आहेत. मात्र फक्त अमरावती मध्यवर्ती आगारातून अत्यावश्यक सुविधेकरिता बसेस सोडल्या जात आहेत. यामध्ये एक नागपूर, एक वरूड तर दोन परतवाडासाठी बस सोडण्यात येत आहेत. या मार्गावर फारशी गर्दीसुद्धा नाही. शनिवारी प्रवास करणाऱ्यांची संख्या फक्त ८० होती.

बॉक्स : तीच ती कारणे

१) कोविडमुळे नातेवाइकांचा मृत्यू झाल्यामुळे अंत्यसंस्काराला किंवा नातेवाइकाच्या भेटीला,

२) लॉकडाऊनपूर्वी नातेवाइकांची लग्न जुळले असेल तर लग्नसमारंभाकरिता

३) अपघात झाला आहे, रुग्ण भरती आहे किंवा इतर आजारामुळे नातेवाइक दवाखान्यात उपचार घेत आहे. त्यांना भेटण्याकरिता असे कारणे दिली जात आहेत.