शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

१५ केळी उत्पादकांना ४३ लाखांची भरपाई

By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST

मर रोगाने हानी झालेल्या जिल्ह्यातील १५ केळी उत्पादकांना रोपे विकणाऱ्या कंपनीने ४३ लाख १९ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

अमरावती : मर रोगाने हानी झालेल्या जिल्ह्यातील १५ केळी उत्पादकांना रोपे विकणाऱ्या कंपनीने ४३ लाख १९ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. सन २०१३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील ‘कोरे बायोटेक’ कंपनी द्वारा उतीसंवर्धन केळीची रोपे शेतकऱ्यांनी विकत घेतली होती. कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली. मात्र, काही दिवसांत ‘मर’ रोगाने ४० टक्क्यावर रोपे सुकली. तरीही कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद व कागदपत्रांची शहानिशा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४३ लाख १९ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. उतीसंवर्धक केळीची रोपे सुकत असताना कंपनीद्वारे शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले नाही. परिणामी फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दिलीप लाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. कृषी अनुसंधान केंद्राचे कृषी विषयतज्ज्ञ पी.एच.महल्ले, के.पी.सिंग, व्ही. डी.खवली, महाबीजचे अधिकारी सलामे, कृषी अधिकारी रावंडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली असता केळीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. समितीच्या अहवालानुसार कोरे बायोटेक बनाना टिश्यूकल्चर लॅब अ‍ॅन्ड नर्सरी, जि. सोलापूर यांचे उतीसंवर्धन केळी रोपे वापरलेल्या शेतात २८ ते ७७ टक्क्यापर्यंत मर आढळून आली. कंपनीने निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याचे अहवालात स्पष्ट केले. ग्राहक पंचायतीद्वारा रवींद्र मराठे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार केली. कंपनीद्वारा एन.बी.कलंत्री यांनी बाजू मांडली. तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी ४३ लाख १९ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. (प्रतिनिधी)