शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी ७० हजारांची, नोकरी केवळ ४२८ जणांना

By admin | Updated: October 10, 2015 00:46 IST

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये सप्टेंबर २०१५ अखेर ७०,४५४ बेरोजगारांनी नोंद केली.

सेवायोजन केंद्रात शुकशुकाट : भरती प्रक्रिया राबविण्याची गरजअमरावती : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये सप्टेंबर २०१५ अखेर ७०,४५४ बेरोजगारांनी नोंद केली. यातील केवळ ४२८ उमेदवारांनी नौकरी मिळविण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे सेवायोजन अर्थात एम्प्लायमेंट कार्ड काढून फायदा तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.१०-१२ वर्षापूर्वी १०वीची गुणपत्रिका हाती येताच विद्यार्थी सेवायोजन केंद्राकडे मोर्चा वळवायचे. रांगेत उभे राहून सेवायोजन कार्ड काढायचे. मात्र ही प्रक्रिया आॅनलाईन झाल्याने या कार्यालयामध्ये स्मशान शांतता पसरली आहे. वर्षोगिणती एम्प्लायमेंट कार्यालयाकडून नौकरीचे ‘कॉल’ येत नसल्याने अनेकांनी हे कार्ड काढण्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. शासकीय किंवा खाजगी नौकरीसाठी एम्प्लायमेंट कार्ड आवश्यक बाब होती. मात्र काळानुरुप या कार्डाचे महत्त्व कमी झाले आहे. संगणकाच्या युगात नौकरीची संधी संकेत स्थळावर उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी तथा बेरोजगारांनी एम्प्लायमेंट आॅफीसकडे पाठ फिरविली आहे. अशातच नौकरी उपलब्ध होत नसल्याने कशाला वेळ दवडायचा, या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा आकडा खालवला आहे.सन २०१२ मध्ये ९८,९९४, सन २०१३ मध्ये ९०३८७, सन २०१४ मध्ये १,३६,४३० व सप्टेंबर २०१५ अखेर १,२९, १५० विद्यार्थी बेरोजगारांनी नोंद केली आहे. शासकीय खातेप्रमुख आणि खाजगी कंपन्यापूर्वी सेवायोजन कार्यालयाकडे व्यक्तीची मागणी करायचे, त्यानुसार त्यांना सेवायोजना कार्यालयाकडून बेरोजगारांची नावे पुरविल्या जायची. आता हे काम ६६६.ेंँं१ङ्म्नँ१.ॅङ्म५.्रल्ल या संंकेत स्थळावरुन आॅनलाईन केले जाते. सेवायोजन कार्यालयात लागत असलेल्या रांगा आता कालबाह्य झाल्या आहेत. नुतनीकरण करणे हा विषय सेवायोजनेत केंद्रात संपुष्टात आणला आहे. आता तो उमेदवार केव्हाही, कुठेही लॉगीनने आणि पासवर्ड घेऊ शकतो. (प्रतिनिधी)