शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राम मेघे अभियांत्रिकीतील ८५ कर्मचाऱ्यांना डच्चू

By admin | Updated: May 10, 2014 02:29 IST

येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेमधील ८५ कर्मचाऱ्यांच्या ....

अमरावती : येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेमधील ८५ कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवून नव्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला आहे. एकाचवेळी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना डच्चू देण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे संदीप मेघे यांना मोठा धक्का असल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा निर्माण झालेल्या शिक्षण संस्थाचे जाळे विदर्भात शिवाजी शिक्षण संस्थेनंतर दुसर्‍या क्रमांकाचे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, दंत महाविद्यालय, तांत्रिकी महाविद्यालयासह कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या अनेक शाखा आहेत. मात्र कालांतराने कार्यकारिणीत सदस्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाले. पदाधिकारी नियुक्ती असो की महाविद्यालयात कर्मचार्‍यांच्या नियुक्त्याचा वाद न्यायालयात पोहचला. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संदीप मेघे यांच्या विरुध्द कार्यकारिणीतील सदस्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने संदीप मेघे यांनी कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींची नियुक्ती रद्द करुन जुन्याच सदस्य संख्येच्या आधारे नव्याने कार्यकारिणीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मार्च २०१४ मध्ये कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अखेर संदीप मेघे आणि त्यांच्या समर्थकांना कार्यकारिणीतून बाहेर व्हावे लागले. मात्र संस्थेचे प्रकरण न्यायालयात सुरु असताना या दरम्यान संदीप मेघे यांनी केलेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्त्यांवर कुºहाड कोसळली आहे. १३ डिसेंबर २०११ पर्यंत संदीप मेघे यांच्या कार्यकारिणीने कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या किंवा आर्थिक व्यवहाराविषयीचे निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाचे बंधन होते. तरीदेखील मेघे यांनी अध्यक्षपदावर असताना राम मेघे अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेत चक्क ८५ कर्मचार्‍यांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्या. आर्थिक व्यवहारही झाल्याचा विद्यमान कार्यकारिणीचा आरोप आहे. नातेवाईकांचा गोतावळा सांभाळण्यातच संदीप मेघे मग्न राहिलेत, न्यायालयाचे बंधन त्यांनी पाळले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त जागांचा भरणा करुन संस्थेवर आर्थिक भुर्दंड त्यांच्यामुळेच वाढला ही वस्तुस्थिती निर्माण झाली असल्याचाही आरोप होत आहे. (प्रतिनिधी)