शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मार्डीकरांच्या गटनेतेपदाला स्थगनादेश

By admin | Updated: September 6, 2014 01:25 IST

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रं टमध्ये गटनेता पदाचा वादावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला प्रारंभ करताना अविनाश मार्डीकर ...

अमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रं टमध्ये गटनेता पदाचा वादावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला प्रारंभ करताना अविनाश मार्डीकर यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम केलेल्या गटनेते पदावर स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या स्थगनादेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतापदी सुनील काळे राहतील, असा स्थगनादेश देताना पुढील सुनावणीची तारीख १२ सप्टेंबर ही निश्चित करण्यात आली आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांची नियुक्ती कायम असल्याचा निर्णय दिला. मात्र हा निर्णय म्हणजे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नसल्याचा उच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमिवर या निर्णयाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील काळे यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आणणारा असल्याचे म्हटले आहे. महापालिकेत युती किंवा आघाडी करीत असताना काणताही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष विलीन होऊ शकत नाही, हे सुनील काळे यांनी याचिकेचा मुख्य मुद्दा बनविला होता. त्यानुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होताच मार्डीकर यांचे गटनेतेपदी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करुन सुनील काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता राहतील, असा स्थगनादेश देताना निर्णय दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राजकीय समीकरण बदलण्याचे संकेतअमरावती : ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अविनाश मार्डीकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट गटनेतेपदाला स्थगनादेश मिळाल्याने राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनील काळे यांची बाजू अ‍ॅड. मरलपल्ली यांनी मांडली तर अविनाश मार्डीकर यांच्यावतीने अ‍ॅड. शाम दिवाण यांनी युक्तीवाद केला. स्थगनादेश देताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख १२ सप्टेंबर ही ठरविली आहे. या निवडणुकीनंतर महापालिकेत नव्या राजकारणाला सुरुवात होणार आहे.