शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

विम्यासाठी शेतकऱ्यांनी भरले पावणेचार कोटी

By admin | Updated: September 30, 2014 23:29 IST

शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या

गजानन मोहोड - अमरावतीशासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या १९ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ८५ लाख ३ हजार रुपये या पीक विम्यासाठी सक्तीने कापण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांत रोष आहे. अपुरा पाऊस, पावसातील खंड व अतिपाऊस, नैसर्गिक आपत्ती, आदिवासी शेतकऱ्यांना टोलमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई, सामूहिक स्वरुपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात १९९९ ते २००० पासून ही योजना लागू केली. महसूल मंडळ युनिट गृहित धरुन त्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पन्नाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो. परंतु मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील पिकाची स्थिती, निसर्गाची अवकृपा यावर किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळाले हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची की कंपनीच्या हिताची अशी चर्चा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने जुलै अखेर खरीप हंगामास सुरुवात झाली. मात्र या योजनेची मुदत ३१ जुलै २०१४ रोजी संपली. शासनाने योजनेला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु ३१ जुलैनंतर पेरणी झालेल्या पीक क्षेत्रास ही योजना लागू केली. वाढीव विमा संरक्षण देय ही तरतूद नसणाऱ्या या योजनेची मुदतवाढ सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यंत म्हणजेच उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. मुदतवाढीनंतर बँकांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०१४ पर्यंत वाढविण्यात आली. यामध्ये कापूस पिकाच्या विमा दरात अंशत: बदल केला गेला आहे. या विमा योजनेत जिल्ह्यातील ९ राष्ट्रीयकृत बँकांत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले, अशा १९ हजार ७५ शेतकऱ्यांचे ८५ लाख ३ हजार रुपये सक्तीने विमा हप्त्यापोटी कापण्यात आले.