शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

विम्यासाठी शेतकऱ्यांनी भरले पावणेचार कोटी

By admin | Updated: September 30, 2014 23:29 IST

शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या

गजानन मोहोड - अमरावतीशासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या १९ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ८५ लाख ३ हजार रुपये या पीक विम्यासाठी सक्तीने कापण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांत रोष आहे. अपुरा पाऊस, पावसातील खंड व अतिपाऊस, नैसर्गिक आपत्ती, आदिवासी शेतकऱ्यांना टोलमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई, सामूहिक स्वरुपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात १९९९ ते २००० पासून ही योजना लागू केली. महसूल मंडळ युनिट गृहित धरुन त्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पन्नाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो. परंतु मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील पिकाची स्थिती, निसर्गाची अवकृपा यावर किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळाले हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची की कंपनीच्या हिताची अशी चर्चा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने जुलै अखेर खरीप हंगामास सुरुवात झाली. मात्र या योजनेची मुदत ३१ जुलै २०१४ रोजी संपली. शासनाने योजनेला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु ३१ जुलैनंतर पेरणी झालेल्या पीक क्षेत्रास ही योजना लागू केली. वाढीव विमा संरक्षण देय ही तरतूद नसणाऱ्या या योजनेची मुदतवाढ सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यंत म्हणजेच उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. मुदतवाढीनंतर बँकांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०१४ पर्यंत वाढविण्यात आली. यामध्ये कापूस पिकाच्या विमा दरात अंशत: बदल केला गेला आहे. या विमा योजनेत जिल्ह्यातील ९ राष्ट्रीयकृत बँकांत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले, अशा १९ हजार ७५ शेतकऱ्यांचे ८५ लाख ३ हजार रुपये सक्तीने विमा हप्त्यापोटी कापण्यात आले.