शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

‘प्लेग’ने उद्ध्वस्त वरूडा उजाडच!

By admin | Updated: December 2, 2015 00:11 IST

येथून एक किलोमीटर अंतरावर चहूबाजूंनी नटलेल्या निसर्गसौंदर्यात वरूडा गाव वसलेले होते.

शतकानंतरही पालटली नाही कळा : पडक्या भिंती, मंदिरे, विहिरींचे अवशेष शिल्लक अमोल कोहळे  पोहरा बंदीयेथून एक किलोमीटर अंतरावर चहूबाजूंनी नटलेल्या निसर्गसौंदर्यात वरूडा गाव वसलेले होते. सुमारे १०० वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली आणि एकापाठोपाठ एक घराघरांतून माणसे दगावली. संपूर्ण गावाला प्लेगच्या साथीने वेढले होते तेव्हापासून उजाड झालेले हे गाव अद्यापही वसले नाही. या गावाचे इतरत्र कुठे पुनर्वसनही झाले नाही.पोहरापासून जवळच असलेल्या घनदाट जंगल क्षेत्राला उजाड वरूडा म्हणून ओळखले जाते. जेथे आज जंगल आहे तेथे १०० वर्षांपूर्वी गाव वसले होते, याची तेथील काही पुरातन वस्तू साक्षी आहेत. ज्या जागी लोकांचे अस्तित्व होते, ती जागा वृक्षवल्ली प्राण्यांनी व्यापली आहे. पशुपक्षी गोड कंठाने दु:खी वरूडाचा इतिहास सांगत वरूडाच्या जखमेवर फुंकर मारण्याचा जणू प्रयत्न करीत असल्याचा भास निर्माण होतो. १९ व्या शतकात ब्रिटिशांना देशातून परतवून लावण्यासाठी खेड्यात मशाली पेटल्या असताना त्याचवेळी महामारी व व प्लेगसारख्या रोगाने थैमान घालून अनेक गावांना पीडित करून सोडले होते, असे सांगितले जाते. उंदराच्या पाठीवर येणाऱ्या प्लेगच्या साथीला वरूडा गाव बळी पडल्याचे काही जाणकारांनी सांगितले. त्याकाळी प्लेगवर रामबाण औषधी उपलब्ध नव्हती. मग ज्या गावात प्लेग आला तेथील मंडळीला गाव रिकामा केल्याशिवाय पर्याय नसायचा. प्लेगची साथ १०० वर्षांपूर्वी वरूडा गावावर आल्याने येथील माणसांसह पाळीव प्राणीही नष्ट झाले. उजाड वरूडाला भेट दिली असता आजही हे गाव स्वकीयांना हरविल्याबद्दल अश्रू ढाळत असल्याचे जाणवते. गावात थोड्याच अंतरावर पाटलाच्या वाड्याच्या पडक्या भिंती शेवटच्या घटका मोजत आहेत. वाड्यांच्या बाजूला एक मारूतीची मूर्ती उभी आहे. शेजारीच एक विहीर आहे. लोकांच्या सहवासात राहणारा हा हनुमान आजही निवांतपणे उभा असून येथे कधी तरी वरूडा नावाचे गाव होते याची साक्ष देत विराट घनदाट जंगलाचा पहारेदार बनलाय आजूबाजूला जमीनदोस्त झालेल्या घरांचे जोते (पायवे) आढळतात परिसराला वन विभागाने नवीन वनसंरक्षण कुटी तयार केली. आता वरूडा जंगल म्हणून ओळखले जात आहे. येथे उघड्यावर बजरंग बलीच्या मूर्ती आहे. येथे त्यांच्या मृत्यू पश्चात वनविभागाची वनसंरक्षण कुटी उभारण्यात आली आहे. वरूडाच्या या पूर्वेतिहासाबद्दल आजूबाजूच्या गावातील ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा दुजोरा दिला. वन विभागाच्या नोंदीत वरूडा गाव आढळते. बजरंग मूर्ती विहीर व पडक्या अवस्थेतील वाडा वरूडा गावाचा ठोस पुरावा म्हणून समोर येतो. तरोडा, वरूडा, ब्रह्मी, नवसारी ही गावे प्लेगच्या साथीने उजाड झाली होती. त्यावेळी या गावात एकामागे एक जीव मृत्यूमुखी पडत गेले. दिवसभर स्मशानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खड्डे करावे लागत होते. त्यावेळी या आजारावर कोणताच रामबाण ईलाज उपलब्ध नसल्याने लोक काळजी घेत. प्लेगची साथ पसरल्यानंतर कोणताही नातेवाईक भेटीला सुध्दा येत नसे. उदध्वस्त झालेल्या या गावाचे भाग्य अद्यापही उदयास आले नाही.- मुरलीधर भालकर, (९०, रा. पोहरा बंदी), प्लेग साथीचे साक्षीदार.