शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मँगो ज्यूसमध्ये पपईचा रस!

By admin | Updated: May 16, 2015 00:44 IST

सध्या एक किलो आमरसाचे उत्पादन मूल्य ८२ रुपये आहे. आंबा खराब असेल तर हा रस ७५ रुपयांनाही मिळतो; ...

अमरावती : सध्या एक किलो आमरसाचे उत्पादन मूल्य ८२ रुपये आहे. आंबा खराब असेल तर हा रस ७५ रुपयांनाही मिळतो; परंतु हा दर आणखी कमी करण्यासाठी आता चक्क पपईचा आधार घेतला जात आहे. पपईचा रस आंबा रसात मिक्स करून तो महागड्या किमतीत ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. पिताना मात्र ग्राहकाला हा रस कसला आहे हे लक्षातच येत नाही. त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे, बऱ्याच वेळा जुन्या बीअरच्या बाटल्या स्वच्छ करून त्यात हा रस भरून ठेवला जातो. काय आहे कॅनिंग?आंबा पिकतो, रस गळतो हे आंब्याचे प्रसिद्ध गाणे प्रचितीला येते ते मे महिन्यामध्ये. आंब्याचा रस काढण्याचे दिवस सुरू होतात. म्हणजेच आंब्याचे कॅनिंग सुरू होते. खरे म्हणजे आंबा कॅनिंग सुरू झाले की, आंबा निर्यातीचे दिवस संपले. आंबा मोसमाचे अखेरचे दिवस सुरू झाले असे समजावे. पुढील मोसमासाठी आंब्याचा रस कॅनमध्ये म्हणजे बाटलीमध्ये साठविण्याच्या प्रक्रियेला कॅनिंग म्हणतात. कॅनिंगसाठी कोणताही आंबा कॅनिंग याच काळात सुरू होते. आंबा कॅनिंगसाठी कोणताही आंबा चालतो. या आंब्याचा दर किलोला १0 रुपयांपासून सुरू होतो. म्हणजे कॅनिंगचा आंबा सुमारे २00 रुपये डझन या दराने खरेदी केला जातो. बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की, आंब्याचा दर विकत घेणारे म्हणजे कॅनिंगवाले ठरवितात. वास्तविक हा दर आंबा रस विकत घेणाऱ्या कंपन्या ठरवितात. यानंतर मोठे एजंट नेमले जातात. जे हा रस काढतात किंवा काढलेला रस पिंपाद्वारे विकत घेतात. मोठे कॅनिंगवाले छोटे-छोटे व्यापारी नेमून ग्राहकांकडून आंबा घेतात. प्रत्येकाचे कमिशन वजा जाता अखेर शेतकऱ्याच्या हातात किलोला १0 रुपये पडतात. या आंब्यामध्ये डागी आंबा, कोवळा आंबा म्हणजेच जो मार्केटमध्ये विकला जाणार नाही, असा आंबा असतो.