शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या पांडुरंगा बिगी-बिगी धाव रे,

By admin | Updated: July 1, 2015 00:44 IST

आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

पाण्यावाचून तळमळते आता सारे गाव रेपावसाची दडी : खरिपाची पेरणी धोक्यातसंजय जेवडे नांदगाव खंडेश्वरआठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. जवळपास १७ ते २२ जूनपर्यंत पावसाची जोमात सुरुवात झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील बियाणे दडपले गेले, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी साचल्याने दलदल निर्माण होऊन ट्रॅक्टरची पेरणी खोळंबली होती. नंतर दोन तीन दिवसांनी शेतकऱ्यांंनी पेरणीला सुरुवात केली. पण २२ जूनपासून पावसाने दांडी मारल्याने आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. तालुक्यात आतापर्यंत ३५ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. संत्रा बहर फुटलाच नाही. सुरुवातीच्या पावसामुळे संत्रा पिकाने नवती काढली. नंतर पावसाचा खंड व कडक उन्हामुळे संत्राबागेत मृग बहर फुटलाच नाही. वातावरणातील बदल व त्याचा झालेल्या विपरीत परिणामामुळे संत्राबागा फुटल्या नसल्याचे संत्रा उत्पादक रमेश शिरभाते यांनी सांगितले. या तालुक्यात २३ जूनपर्यंत २२२ मी.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात ७० टक्क्यांवरील पेरणी आटोपली आहे. मात्र मागील ९ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवलेच नाही. आदी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकांचे उंबरठे झिजविले. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे कित्येक शेतकरी बँकेचे घेतलेले पीक कर्ज परत न करू शकल्याने कर्ज पुनर्गठन करण्यासाठी बँकेच्या वाऱ्या सुरु केल्या. महागडे बियाणे व खते जमिनीत पेरली. आणि आता मोड आल्याने दुबार पेरणीचे संकट नशिबी आले आहे, अशी या तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे. किती अंत आता पाहसी देवराया, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.देवा पांडुुरंगा, जनाबाई सोबत तू गोवऱ्या वेचल्या. गोरोबा काकासोबत माती तुडवून लागून मडकी घडू लागली. चोखा-मेळ्या सोबत ढोरे ओढलीस इतकेच नाही तर सावता मेळ्याचा मळाही राखला. भक्तांच्या हाकेला धावून येतोे हे तुझे ब्रीद असताना या दिन बळीराजाची आर्त हाक तुला ऐकू कशी येत नाही? आषाढी एकादशीला पंढरीची वारी घडावी म्हणून कित्येक वारकरी शेतकरी पेरणी आटोपताच तुझ्या चरणावर मस्तक टेकवण्यासाठी पंढरपूरला येतात. आता तर शेतकऱ्यांकडे असलेले सारे बी-बियाणे शेतात पेरले. पाण्यावाचून बियाण्यांचे अंकुर जळू लागले आहेत. वाढलेले मजुुरीचे दर, महागडे बियाणे व रासायनिक खते या बाबीमुळे आधीच जेरीस आलेला शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. भकास व आशाळभूत नजरेने आकाशातील ढगाकडे पाहत आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी आता पेरणीही थांबविली आहे.प्रखर उन्हामुळे अंकुर जळू लागलेप्रभाकर भगोले चांदूररेल्वेतालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प असले तरी दोन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ४० टक्के पेरणी केली. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, तूर पावसाअभावी व प्रखर उन्हामुळे कोंब येऊन सुकू लागले आहे. मागील वर्षी अतिपावसाने खरीप पिकाला जबर तडाखा बसून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु याही वर्षी झालेल्या नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. परंतु पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आजपर्यंत सोयाबीन ५८७२ क्विंटल, कापूस १७९ क्विंटल, तूर १८० क्विंटल, ज्वारी ३१ क्विंटल, मूग ४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कृषी विभागाचा ग्रामीण भागातील कृषी सहकाऱ्यांकडून झालेल्या २४ जूनच्या अहवालानुसार सोयाबीन पेरणी १२५६.६० क्विंटल, तूर २८४-८० क्विंटल, कापूस ५२६-५० क्विंटल पेरणी झाल्याची माहिती कृषी खात्याने दिली.