शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेशनधान्य वाटपासाठी आता १२ सूत्री कार्यक्रम

By admin | Updated: August 22, 2016 00:08 IST

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरण ‘आॅनलाईन’ नियतन, वितरण प्रणाली, द्वारपोच योजना,...

पुरवठा विभागाचे निर्देश : प्रमाणपत्रानंतर रेशन दुकानदारांना धान्यपुरवठाअमरावती : अन्नधान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरण ‘आॅनलाईन’ नियतन, वितरण प्रणाली, द्वारपोच योजना, संकेतस्थळ असे उपक्रम राबविण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. शासनाचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात पारदर्शकता वाढविण्यासाठी १२ कलमी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दिले आहे. यामध्ये रेशन दुकानदाराने मागील धान्याचे वाटप केल्यानंतर दोन व्यक्तींचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पुढील महिन्याचे धान्य मंजूर होणार आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, नगरसेवक यापैकी दोघांचे प्रमाणपत्र दुकानदारांनी घेणे अपेक्षित आहे. याखेरीज दुकानात उपलब्ध अन्नधान्याची माहिती एसएमएसद्वारे २५० शिधा पत्रिकाधारकांना कळवायची आहे. त्यासाठी ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ प्रणालीवर एसएमएस सुविधेत लाभार्थ्यांची नोंद करणे अनिवार्य असेल, सुधारित धान्य वितरण पद्धती अंतर्गत अन्नधान्य पोच केल्यानंतर गावातील किमान दोन व्यक्तींची साक्षीदार म्हणून वाहतूक पासवर स्वाक्षरी बंधनकारक केले आहे. दुकानात प्राप्त अन्नधान्य विक्रीचे रजिस्टर ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करावयाचे आहे. कुणाच्या नावावर किती अन्नधान्य वितरण झाले, याची माहिती शिधापत्रिकाधारकांच्या नोंदवहीचे ग्रामीण भागात चावडी वाचन करावयाचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तक्रार निवारण प्रणालीबाबत विविध सुविधा असल्याची नोंद, टोल फ्री क्रमांक, शिधापत्रिकाधारकांची संगणकीकृत यादी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टॉन्सरन्सी पोर्टलवर विविध अहवाल दुकाननिहाय असणे आवश्यक आहे. अन्नधान्य, साखर, रॉकेल मिळालेल्या आदेशाच्या प्रति खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, पं.स. सभापती, सरपंच आदींना द्यावयाच्या आहे. दुकानदाराने धान्य पोहोचल्याची व वाटपाची मुनादी देऊन नोंद ठेवावयाची आहे. १२ कलमी कार्यक्रमानुसार दुकानदाराने ग्रामदक्षता समितींच्या बैठकी घेऊन सदस्यांना धान्याचा दर, परिमाण, योजनानिहाय प्राप्त होणाऱ्या धान्याच्या तहसीलची माहिती द्यायची आहे. अन्नधान्याचे वाटप, समिती सदस्य व लोकप्रतिनिधींसमोर ठरलेल्या दिवशी करावयाचे आहे. समितीच्या अहवालाशिवाय तहसील कार्यालयाकडून परवान्याचे वाटप करू नये, एवढेच नव्हे तर दुकानाच्या दर्शनी भागात लाभार्थ्यांची यादी लावण्याची सक्तीही केली आहे. प्राप्त अन्नधान्य विक्रीचे रजिस्टर ग्रा.पं.मध्ये प्रसिद्ध करावयाचे आहे. कुणाच्या नावावर किती धान्याचे वितरण झाले, यादी शिधापत्रिकाधारकांना मिळण्यासाठी हा उपक्रम आहे. यात शिधा पत्रिकाधारकांच्या नोंदवहीचे ग्रामीण भागात चावडी वाचन केले जाईल. दर महिन्याला होणार अन्नदिन साजरासार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शी व्हावी, या योजनेत अधिक कार्यदक्षता यावी, याकरिता सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सोशल आॅडीट करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येईल. तसेच रेशनवरील धान्याचा होणारा काळाबाजार, तसेच गैरव्यवहार रोखण्यास मदत होईल. याकरिता जिल्ह्यात रेशन धान्य दुकानदारस्तरावर दर महिन्याला ‘अन्न दिन’ साजरा करावा, असे पुरवठा विभागाचे निर्देश आहेत.