शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठीच्या प्रतिकुल क्षेत्रांचा उल्लेख नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : प्राथमिक शिक्षकांच्या नव्या बदली धोरणात महिलांसाठी असलेल्या प्रतिकुल क्षेत्रांचा उल्लेखच नसल्याने यापूर्वी अशा क्षेत्रात काम करणाऱ्या ...

अमरावती : प्राथमिक शिक्षकांच्या नव्या बदली धोरणात महिलांसाठी असलेल्या प्रतिकुल क्षेत्रांचा उल्लेखच नसल्याने यापूर्वी अशा क्षेत्रात काम करणाऱ्या महिला शिक्षकांवर नव्या धोरणामुळे अन्याय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सन २०१७ च्या बदली धोरणात महिलांसाठी प्रतिकुल क्षेत्र ठरविण्यात आले होते. आदिवासी, नक्षलग्रस्त, डोंगराळ, आडवळणाचे तसेच हिंस्त्र श्वापदांचा वावर असणारे क्षेत्र म्हणजे प्रतिकुल क्षेत्र, अशी व्याख्या करण्यात आली होती. या क्षेत्रात असलेल्या शाळांमध्ये काम करणाऱ्या महिलांना ठराविक कालावधीनंतर इच्छित स्थळीत बदली मिळत असे. मात्र, २०२१ च्या नव्या बदली धोरणात अशा प्रतिकुल क्षेत्राचा उल्लेखच झालेला नाही. त्यामुळे यापूर्वी प्रतिकुल क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षिकांना कोणता न्याय लावणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नव्या धोरणात अशा क्षेत्रांचा समावेश करावा, यापूर्वी काम केलेल्या शिक्षिकांना सेवा कालावधीची अट न घालता बदली प्रक्रियेत प्राधान्याने सामावून घेण्याची भूमिका मांडली जात आहे. रिक्त जागा असूच नये म्हणून तात्काळ भरती प्रक्रियेमार्फत पदस्थापना द्यावी. बदली आदेशात प्रशासकीय बदली किंवा विनंती बदली, असा स्पष्ट उल्लेख करून सेवा पुस्तिकेत तशी नोंद करावी. गत कित्येक वर्षांपासून आपल्या परिवारापासून लांब राहून सेवा देणाऱ्या महिला शिक्षकांच्या कौटुंबिक आरोग्याचा विचार करून अनुकुल निर्णय घेण्याची अपेक्षा प्राथमिक शिक्षक समितीने व्यक्त केली आहे.

बॉक्स

ग्रामविकास मंत्र्यांकडे मांडल्यात समस्या

प्राथमिक शिक्षक समितीने ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये बदली प्रक्रियेत प्राथमिक शिक्षकांची ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंतची सेवा ग्राह्य धरून बदलीस पात्र ठरवणे प्रशासकीय दृष्टीने आवश्यक आहे. २०१८ व २०१९ च्या बदल्यांवेळी ज्या शिक्षकांची विस्थापित म्हणून पदस्थापना झाली अशा शिक्षकांना यंदा बदली प्रक्रियेत प्राधान्य द्यावे. पूर्वीच्या धोरणानुसार अवघड क्षेत्रात असलेली गावे नव्या धोरणानुसार अवघड क्षेत्रात येत नसल्यास त्याठिकाणी तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षिकांना अवघड क्षेत्रात सेवा केल्याचा लाभ मिळावा.

कोट

नव्या धोरणाबाबत शिक्षक संघटनांच्या शिफारशी मागितल्या. मात्र, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी किमान ऑनलाईन संवाद साधून चर्चा झाली असती तर काही अपेक्षित बदल करता आले असते. नव्या धोरणात काही चांगल्या बाबी आहेत तशाच त्रुटी पण आहेत.

- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी,

प्राथमिक शिक्षक समिती