शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान गरजेचे

By admin | Updated: July 1, 2016 00:16 IST

जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कृषी तज्ज्ञांचा सल्ला : बियाण्यांची काळजी हवी, पट्टापेर पद्धती योग्य अमरावती : जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अपेक्षित उत्पन्न तेव्हाच मिळू शकते. बियाणे अधिक खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी, पेरणीनंतर पावसाचा खंड योग्य निचरा न होणारी जमीन आदी कारणांमुळे बियाण्यांची उगवण शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे खरिपाचे प्रमुख पीक आहे व खरीपाच्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्के पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीनची मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी व जमिनीच सामू ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीची निवड करावी. हलक्या, उथळ व क्षारयुक्त जमिनीवर सोयाबीनची पेरणी करू नये. सलग १० वर्षापासून सतत एकाच क्षेत्रात व एकाच वाणाचा उपयोग केल्यामुळे कीड व रोगांचा प्रकोप वाढतो व त्यासाठी सोयाबीन पिकाची कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती कारणीभूत ठरते. सर्वसाधारणपणे सोयाबीन,मूग,उडीद या पिकांची बैलजोडीने पेरणी करायची झाल्यास तिनदाती तिफन अथवा काकटीने पेरणी करायची झाल्यास प्रत्येक वेळी परंतु येताना चौैथी ओळ रिकामी ठेवावी व या ओळीत डवराच्या फेटाच्या वेळी, डवरणी आटोपल्यानंतर लगेचच, केवळ दोरी बांधून डवऱ्याच्या सहाय्याने गाळ पाडून घ्यावा. प्रत्येक तीन ओळीमधून पीक गादी वाफ्यावर करून घ्यावे. टॅ्रक्टरद्वारे पेरणी करायची झाल्यास सात दात्याच्या पेरणी यंत्राने पट्टावेट पद्धतीने पेरणी करायची झाल्यास सात दात्याच्या पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या बियाण्यांच्या कप्प्यातील चवथे छिद्र बंद करावे . प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येतांना एक ओळ खाली रेवावी (आठवी ओळ) म्हणजेच संपूर्ण शेतात प्रत्येक तीन ओळांना चौथी ओळ रिकामी राखली जाईल व प्रत्येक चौथ्या ओळीवर उवरणीच्या वेळी, उवरणी आटोपल्यानंतर एका डवऱ्याच्या सहायाने गाळ ओढून पट्टापेर पद्धतीने पीक गादी वाकयावर घ्यावा असा सल्ला शिवाजी कृषी महाविद्यालयाचे जितेंद्र दुर्गे व मनोज नवरे यांनी दिला आहे. पेरणीकरिता आणलेल्या बियाण्याची पिशवी खालून फोडावी बियाण्याची पिशीव पिशवीवरील टॅग जपून ठेवावी. साधारणत: ७५ ते १०० मि.म. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पेरणी योग्य आलावा असतांनाच बियाण्याची पेरणी करावीे पेरणी योग्य ओलावा जमिन३ीमध्ये आहे किंवा नाही या करिता शेतातील मातीचा गोळा करावा तो व्यवस्थित घट्ट होतो की नाही दो पाहावा. तद्नंतर दूर फेकावा. तो गोळा फुटला असता पेरणी योग्य ओलावा नाही, असे समजावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २-३ ग्राम कार्बोक्सिन ३७.५ व थायरम ३७.५ % (मिश्र घटक) या प्रमाणात लावावे. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर रायसोबियम जपोनिकम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू पी.एस. बी. २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावू नंतर पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर ४५ बाय ५ से.मी. ठषवावे, भरघोस उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या ४ ते ४.५ लाखापर्यंत ठेवावी. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम करावी. शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन भुसभुशीत होते, अशा जमिनीत पेरणी ट्रॅक्टरने केल्यास बियाणे अधिक खोलीवर पडते. खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे योगेश इंगळे, मंगेश दांडगे यांनी दिली.पट्टापेर पद्धतीचे फायदे बियाण्यांचे प्रमाण कमी लागते, बियाणे खर्चात बचत होते, पेरणी लवकरच व सोईची होते, शेतात वेळोवेळी पेरफटका मारणे सोईचे होते, किडी व रोगांची निगारणी व निरीक्षण शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात फवारणी योग्य रितीने करता येते, शेतात हवा खेळती राहते, सूर्यप्रकाशासाठीची स्पर्धा कमी होते, सरीच्या वाटे ओलीत करता येते, तुषार सिंचन करणे सोईचे होते. काठावरील ओळींना बॉर्डर इफेक्ट मिळतो, शेतात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी संवर्धन शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात िपकाचे काटेकोर व्यवस्थापन शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात पिकाची एकसमान वाढ मिळते, प्रत्येक पट्ट्यात पिकाची एकसमान वाढ मिळते, पिक गादीवाफ्यावर असल्यामुुळे पावसाचे पाणी व पिक यांचा सरळ संबंध टाळता येतो, मुलस्थानी पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाचा माध्यमातून जमिनीतील ओल शेवटपर्यंत टिकवून ठेवल्यास मदत होते.