शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमदार साहेब, विजेची समस्या एवढी सोपी नाही!

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे व आ.रमेश बुंदिले यांनी तालुक्यात गुरूवारी संयुक्त दौरा केला.

ट्रान्सफार्मरची क्षमताच संपली : दुरूस्ती होणार तरी कशी?, नवीन कंत्राटदार नेमून उपयोग काय? त्रस्त नागरिकांचा सवालअंजनगाव सुर्जी : पालकमंत्री प्रवीण पोटे व आ.रमेश बुंदिले यांनी तालुक्यात गुरूवारी संयुक्त दौरा केला. येथील वीज वितरणच्या कार्यालयापुढे त्यावेळी दहिगाव आणि खिराळा येथील ग्रामस्थ विजेच्या समस्या निवारणासाठी सत्याग्रहाला बसले होते. मंत्री व आमदारांनी अंजनगाव-अकोट रस्त्यावर ठिकठिकाणी भूमिपूजन केले. पण या शेतकऱ्यांना भेटण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. दुसऱ्या दिवशी आमदारांनी वृत्तपत्रांना प्रेसनोट दिली, त्यात आठवडाभरात तालुक्यातील विजेचे ट्रान्सफार्मर देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्याचे व नादुरूस्त ट्रान्सफार्मर दुरूस्तीचे आदेश अभियंत्यांना दिल्याचे सांगण्यात आले. मुळात ट्रान्सफार्मरची देखभाल व दुरूस्ती हा विषयच संपला आहे. कमी क्षमतेच्या या यंत्राची देखभाल दुरुस्ती होऊच शकत नाही. ते वारंवार जळतात. त्यांची क्षमता वाढविण्याची नितांत गरज आहे. वीज पारेषण कंपनीने शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०१५ ला ४२.५० कोटी रूपयांचे कंत्राट दिले होते. त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गरजांसह परिसरातील इतरही गरजा पूर्ण करण्याची क्षमता होती. पण कंत्राटदाराची हयगय आड आली. गेल्या दहा महिन्यापासून मंदगतीने चालणाऱ्या या कामाची तक्रार पंचायत समितीचे माजी सभापती व कसबेगव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे यांनी पालकमंत्र्यांना दिली. प्रलंबित कामानुसार जानेवारी २०१५ ला अचलपूर डिव्हीजनमधील देण्यात आलेल्या कंत्राटात तालुक्यातील पांढरी व लखाडसह अचलपूरमधील हरम, हिरुळपूर्णा व मेघनाथपूर येथे पाच सबस्टेशन उभारण्याचा समावेश होता. पण पांढरीच्या कामाला जेमतेम आता सुरुवात झाली. लखाडमध्ये काहीही नाही. परिसरात एकूण तीनशे पंच्याहत्तर नवीन डीबी तयार करण्याचे कंत्राटात नमूद आहे. पण कंत्राटदाराने अद्याप एकही डीबी लावली नाही. सर्वात महत्त्वाची ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्याची तरतूद होती व ६३ पॉवरच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी १०० पॉवरचे एकूण ३०० ट्रान्सफार्मर लावण्याची कंत्राटात तरतूद होती. मात्र अकरा महिन्यांत फक्त पन्नास ट्रान्सफार्मर बदलविण्यात आले. या कामाला पूर्ण करण्यासाठी तेरा महिन्यांचा अवधी लागणार आहे. अंजनगाव तालुक्यातील विहिगावपासून पूर्वेस खल्लारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोनशे केव्हीचे सबस्टेशन ४ आॅक्टोबर २००८ पासून मंजूर आहे. या कामाचा खर्च त्यावेळी ११४ कोटी रुपये होता. मात्र ज्या कंपनीने हे काम घेतले त्या कंपनीने दिलेल्या कालावधीत पूर्ण न केल्याने ते रद्द झाले. तेव्हापासून तीन वेळा निविदा काढल्यात. पण, कंत्राटदार काम का सुरू करीत नाही याचे वीज वितरण कंपनीला काहीही घेणे-देणे नाही. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या सबस्टेशनचे काम झाले असते तर परिसरातील विजेच्या समस्या बऱ्यापैकी दूर झाल्या असत्या. पण याचा पाठपुरावा सोडून आमदार वृत्तपत्रांना प्रसिद्धीच्या प्रेसनोट देत आहेत. अंजनगाव सबस्टेशनवर ३३ केव्हीला क्षमता वाढवून आलेले ५० एम.व्ही.ए.ऐवजी १०० एम. व्ही. ए. चे ट्रान्सफार्मर मंजूर आहेत. पण वीज कंपनीने अजूनही या कामाचे कंत्राट दिले नाहीत. आमदार मात्र ट्रान्सफार्मर देखभाल व दुरूस्तीच्या भानगडीत पडले आहेत. वीज कंपनीची ही मंदगती आमदार पूर्वी स्वत: वीज कंपनीचे मोठे अधिकारी असल्याने चांगल्या तऱ्हेने जाणतात. त्यावर त्यांनी उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांवर मोठे उपकार होतील. कामांचा पाठपुरावा होणे आवश्यकअंजनगाव तालुक्यात शेतीसाठी उभारलेल्या ट्रान्सफॉर्मर्सची क्षमता कमी झाली आहे. कनेक्शनचा भार वाढल्याने ते वारंवार जळतात. दुरूस्त होऊन येईपर्यंत शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो. ओलीत प्रभावीत होते. निर्माणाधीन कामांचा पाठपुरावा योग्यरीतीने झाला तर वीज कंपनीची पुरवठ्याची साधने मोठ्या क्षमतेने शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात. याकरिता प्रलंबित असलेली कामे त्यांची कारणे शोधून झपाट्याने होणे आवश्यक असल्याचे माजी सभापती शशीकांत मंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.