शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

बिबट्याशी होऊ शकतो सामना

By admin | Updated: September 30, 2014 23:29 IST

वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी

जंगलात फिरणे धोक्याचे : दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यतावैभव बाबरेकर - अमरावतीअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये याकरिता आता जंगलात विनापरवानगीने बिनधास्त फेरफटका मारणे धोक्याचे ठरु शकते.दिल्ली येथील प्राणी संग्रहालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती जंगल परिसरातही होवू शकते. त्यामुळे जिल्ह्यावासीयांनी सावध राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अमरावती शहरानजीकच्या जंगलात बिबट, तडस, कोल्हा व रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अनेकदा नागरिकांना जंगलातील मार्गावर बिबट्याचे दर्शन घडले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात असलेले चार ते पाच बिबट अन्न व पाण्याच्या शोधात अनेकदा शहरलगत आढळून आले आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील रविकिरण कॉलनी परिसरात एका घरातील बाथरुममध्ये बिबट दडून बसला होता. मोठ्या शिताफीने त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते. त्यामुळे बिबट नागरीवस्तीच्या सभोवताल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वडाळीच्या जंगल मार्गाने दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. अनेक जण निसर्ग भ्रमंती करण्याकरिता जंगलात जातात. तर काही जण मौजमस्तीच्या दृष्टीने जंगलात जातात. मात्र जंगलात बिनधास्त फिरणे जीवघेणे ठरु शकते याची पुसटशी कल्पनाही नागरिकांना नसते. मात्र हिंस्त्र पशुंशी सामना होवू शकतो.