शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

बाजार समिती करणार माती, पाणी परीक्षण

By admin | Updated: May 11, 2014 22:45 IST

माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे.

गजानन मोहोड -

माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून माती, पाणी व पाने परीक्षण करुन शेतकर्‍याच्या मोबाईलवर एसएमएसव्दारे अहवाल देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नवीन तंंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकर्‍यांना अधिक उत्पादन मिळावे, यासाठी शेतामधील मातीचे परीक्षण करुन त्यामध्ये कुठल्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकाच वर्षात दोन ते तीन वेळा पीक घेतल्याने मातीचा पोत व आरोग्य बिघडते. जमिनीमधील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी पिकाला आवश्यक पोषक तत्त्व न मिळाल्याने उत्पादनात घट येते. रासायनिक खतांच्या वापरामुळेसुध्दा जमिनीचा पोत खराब होतो. हे जाणून घेणे शेतकर्‍यांसाठी आवश्यक आहे. यासाठी माती परीक्षण अत्यावश्यक ठरते. त्यामुळे बाजार समितीने माती नमुने परीक्षणाचा निर्णय कृषी अनुसंधान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनात घेतला आहे. यासाठी बाजार समितीच्या पहिल्या माळ्यावर स्वतंत्र कक्ष आवश्यक उपकरणांसह सुसज्ज आहे. यामध्ये माती, पाणी, पानांची तपासणी, तेले, प्रथिने, आर्द्रतेचे प्रमाण, बियाणे तपासणी, उगवण क्षमता तपासणीची सोय आहे.