शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टला जिल्ह्यात खो

By admin | Updated: May 28, 2016 00:04 IST

दुष्काळी भूगर्भातील जलपातळी वाढवून संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यातच छेद मिळाला आहे.

३७ कोटींच्या कामांना मान्यता : जिल्हा परिषदेत ‘जलयुक्त शिवार’ अभियानावर छदामही खर्च नाहीजितेंद्र दखने अमरावतीदुष्काळी भूगर्भातील जलपातळी वाढवून संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यातच छेद मिळाला आहे. जिल्हा परिषदेने जलयुक्त शिवाराच्या ३७ कोटींच्या कामांना नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता देऊन निधीदेखील उपलब्ध केला असताना मागील वर्षभरात या कामांवर छदामसुध्दा खर्च झालेला नाही.जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीमधून सन २०१५-१६ मध्ये १९६ कामांसाठी २७ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी १५ कोटी २८ लाख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासर्व कामांना प्रशासकीय मान्यतादेखील देण्यात आली. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने मागील वर्षभरात या कामावर एक रूपयासुध्दा खर्च केलेला नाही. इतकेच नव्हे तर सन २०१६-१७ मध्ये देखील जलयुक्त शिवारच्या ६१ कामांसाठी ८ कोटी ११ लाख रूपयांच्या कामांना २० मे २०१६ पर्यंत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतु यापैकी प्रत्यक्षात एकाही कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे दोन्ही वर्षातील ३६ कोटी ९० लाख रूपयांची कामे सुरू न झाल्याने जि.प.ला मिळालेली ही रक्कम अखर्चित राहिली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेला निधी मिळत नसल्याची सत्ताधाऱ्यांची ओरड सुरू असते. दुसरीकडे शेतकरी हिताच्या या योजनेसाठी प्राप्त कोटयवधीचा निधी मिनीमंत्रालयात चक्क खितपत पडून आहे. जलसंवर्धनात भर टाकणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाची जिल्हा परिषदेने पुरती वाट लावल्याचे चित्र आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षल सत्तेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सरकार निधी देण्यात कुचराई करीत असावे, असा समज असतोे. यात बरेचसे तथ्य असले तरी स्थानिक जिल्हा परिषदेला जलयुक्त शिवार योजनेसाठी शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे या कामांना प्रशासकीय मंजुरी देखील मिळाली आहे.अपेक्षा फोल ठरलीअमरावती : कामांचा धडाका जिल्हा परिषदेमार्फत सुरू होणे, अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ही अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे आता या कोटयवधीच्या निधीचा विनियोग होतो किंवा नाही, हाच प्रश्न चर्चेत आहे. जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत जिल्हा परिषद सिंचन विभागाला सन २०१५-१६ मध्ये २७ कोटी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीमधून सिमेंट नाला बांधकाम, तलावातील गाळ काढणे, नवीन गाव तलाव, केटीवेअर साठवण तलाव, केटीवेअर दुरूती, नाला खोलीकरण व रूंदीकरण आणि ढाळींचे बांध ही कामे करायची होती. मात्र, वर्षभरापासून हा निधी अखर्चित आहे. याशिवाय सन २०१६-१७ मधील ६१ कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखलजिल्हा परिषदेत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर केलेली कामे आणि त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित राहिल्याने यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जातीने लक्ष देऊन हा विषय निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २७ मे रोजी जिल्हा परिषदेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची यानुषंगाने बैठक देखील घेतली.