शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

विमा योजनेसाठी कृषी, महसूलमध्ये समन्वयाचा अभाव

By admin | Updated: July 28, 2016 00:16 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी कृषी व महसूल या दोन्ही विभागात समन्वयाचा अभाव असल्याने....

अर्जांचा तुटवडा : उरले फक्त तीन दिवस, शेतकरी राहणार वंचितअमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी कृषी व महसूल या दोन्ही विभागात समन्वयाचा अभाव असल्याने योजनेत सावळागोंधळ सुरू आहे. मागणीच्या तुलनेत कमी आलेले अर्ज व अंतिम तिथीसाठी तीन दिवस शिल्लक असल्याने बहुतांश शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने सन १९९९ पासून सुरू असलेली राष्ट्रीय पीक विमा योजना व २०१० पासूनची हवामानावर आधारित पीकविमा योजना बंद करून पर्याय म्हणून यंदाच्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. मात्र सुरुवातीपासूनच या योजनेविषयी यंत्रणांमध्ये संभ्रम आहे. तसेच आता कृषी व महसूल विभागामध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. योजनेत खरीप पिकांसाठी २ टक्के इतर रबी पिकांसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. जर यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्ती आली किंवा दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हप्त्यांची उरलेली रक्कम सरकार भरणार आहे. सरकारी अनुदानाला कमाल मर्यादा नसल्याने उर्वरित हप्ता कितीही असला तरी शासन त्याचा भरणा करणार आहे. यापूर्वीच्या विमा योजनेमध्ये हप्त्याच्या रकमेवर मर्यादा असल्याने विम्यापोटी शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळत होती. परंतु या योजनेची मर्यादाच काढून टाकल्याने शेतकऱ्यांना विम्याची पूर्ण रक्कम मिळण्याची शाश्वती आहे. मात्र, ही योजना राबविणाऱ्या शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने योजनेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)पीकपेरा प्रमाणपत्राची अडचणविमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै आहे व महसूल विभागाद्वारा पीक पाहणी अहवाल मात्र १ आॅगस्टनंतर शासनाला सादर करणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्याखालील अधिनियम १९६६ अन्वये खरिपाची पीकपाहणी आॅगस्टमध्ये करण्यात येते. ज्यावेळी पीकपाहणी करण्यात येते त्यावेळी शेतात पीक उभे असणे आवश्यक आहे. त्यामुळे तलाठी पीक पाहणी देऊ शकत नाही. त्यामुळे पीक पेऱ्याबाबतचे घोषणापत्राच्या आधारे कर्जवाटप करुन शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा, हा पर्याय समोर आला आहे.स्वयंघोषणापत्रासोबत पेरेपत्रक महत्त्वाचेविमा कंपनीला शेतकऱ्यांचे स्वयंघोषणापत्र देण्यात आले आहे. यावर शेतकऱ्यांना स्वत: पीक पेरा लिहायचा आहे. त्याच आधारावर तलाठ्याचे हस्तलिखित पेरेपत्रक घ्यायचे आहे, हे तलाठ्यांचे पेरेपत्रक विमा कंपनी ग्राह्य धरणार आहे. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास ४८ तासांत कृषी, महसूल, बँक अथवा विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क केल्यास एकूण संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आपत्ती काळात तत्काळ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जे पीक आपल्या शेतात लावले, त्याचीच नोंद करणे महत्त्वाचे आहे.