शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कौंडण्यपूरचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:19 IST

विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा कठड्याचे लोखंडी पाईप झाले जीर्ण

सूरज दहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक माता आपल्या चिमुकल्या मुलासह पुलाखालून पाण्यात पडली होती. नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. पुलावरील लोखंडी पाईपाचे कठडे सुस्थितीत असते तर चिमुकल्याचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.या नदीवर धामणगाव तालुक्यात बगाजी सागर हे धरण आहे. या धरणाचे बॅक वॉटर कौंडण्यपूर ते धामंत्रीपर्यंत पसरले असल्याने नदीच्या दुतर्फा भरपूर पाणी आहे. यंदा या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वर्धा नदीत सध्याही भरपूर जलपातळी आहे. या पुलाच्या पृष्ठभागाचे क्रॉक्रिट काही ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे पाव किमी. लांबीच्या पुलासाठी हे खड्डे धोकादायक ठरणारे आहे. विशेष म्हणजे वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा अधोरेखित करणारा हा पूल आहे. या राज्यमहार्गावरून यवतमाळ- अमरावती व वर्धा या तिनही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू राहत असल्याने या पुलाचे कठडे मजबूत असणे महत्त्वाचे आहे. पुलाची सुरक्षा कठडे अगदी ३ फुटांपेक्षा कमी असून, जीर्ण झालेले पाईपचे कठडे या पुलाला लावले आहेत. त्यामुळे या पुलाचे कठडे चार फुटांपेक्षा अधिक उंच व मजबूत बसविणे गरजेचे झाले आहे. या पुलावर रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता दिनकर माहुरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.वर्धा नदीचे घाटही असुरक्षितजिल्ह्यासह विदर्भात वर्धा नदीचे पौरानिक महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवाळीनंतर महिनाभर यात्रा असते. हजारो भाविक या नदीपात्रात स्रान करतात. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच तजविज जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली नाही. विकास आराखड्याद्वारे अनेक कामे होत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामे देखील होणे महत्वाचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. या नदी घाटावर दररोज विदर्भातील अनेक गावातून नागरिक अस्थिविसर्जनासाठी येतात. या दरम्यान अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहे. अस्थिविसर्जनासाठी असलेल्या लाकडी डोंग्यात देखील सुरक्षेची कोणतेही साधने नाही. स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने या घाटांवर देखी, सुरक्षेची साधने पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.