शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

कौंडण्यपूरचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:19 IST

विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा कठड्याचे लोखंडी पाईप झाले जीर्ण

सूरज दहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक माता आपल्या चिमुकल्या मुलासह पुलाखालून पाण्यात पडली होती. नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. पुलावरील लोखंडी पाईपाचे कठडे सुस्थितीत असते तर चिमुकल्याचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.या नदीवर धामणगाव तालुक्यात बगाजी सागर हे धरण आहे. या धरणाचे बॅक वॉटर कौंडण्यपूर ते धामंत्रीपर्यंत पसरले असल्याने नदीच्या दुतर्फा भरपूर पाणी आहे. यंदा या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वर्धा नदीत सध्याही भरपूर जलपातळी आहे. या पुलाच्या पृष्ठभागाचे क्रॉक्रिट काही ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे पाव किमी. लांबीच्या पुलासाठी हे खड्डे धोकादायक ठरणारे आहे. विशेष म्हणजे वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा अधोरेखित करणारा हा पूल आहे. या राज्यमहार्गावरून यवतमाळ- अमरावती व वर्धा या तिनही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू राहत असल्याने या पुलाचे कठडे मजबूत असणे महत्त्वाचे आहे. पुलाची सुरक्षा कठडे अगदी ३ फुटांपेक्षा कमी असून, जीर्ण झालेले पाईपचे कठडे या पुलाला लावले आहेत. त्यामुळे या पुलाचे कठडे चार फुटांपेक्षा अधिक उंच व मजबूत बसविणे गरजेचे झाले आहे. या पुलावर रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता दिनकर माहुरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.वर्धा नदीचे घाटही असुरक्षितजिल्ह्यासह विदर्भात वर्धा नदीचे पौरानिक महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवाळीनंतर महिनाभर यात्रा असते. हजारो भाविक या नदीपात्रात स्रान करतात. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच तजविज जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली नाही. विकास आराखड्याद्वारे अनेक कामे होत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामे देखील होणे महत्वाचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. या नदी घाटावर दररोज विदर्भातील अनेक गावातून नागरिक अस्थिविसर्जनासाठी येतात. या दरम्यान अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहे. अस्थिविसर्जनासाठी असलेल्या लाकडी डोंग्यात देखील सुरक्षेची कोणतेही साधने नाही. स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने या घाटांवर देखी, सुरक्षेची साधने पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.