शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण होणार मनोरंजक

By admin | Updated: May 9, 2014 01:00 IST

शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे लगेचच अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके..

ई-बुक्समध्ये रूपांतरअमरावती : शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे लगेचच अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ईबुक्स स्वरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक संशोधन आणि निर्मिती मंडळाच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात यावर्षी ई-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मनोरंजक होणार आहे.सध्या आरटीई व आरटीआय या नियमांची अंमलबजावणी शिक्षण विभागात चालू आहे.या अंतर्गत शिक्षकांना विविध प्रकारची प्रकाशने देण्यात येत आहेत. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी ई स्कूलची निर्मिती करण्यात आली.काही जिल्ह्यांतील काही शाळांमध्ये ई स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. यापूर्वी विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमातील मिळालेली फलश्रृती लक्षात घेता शालेय शिक्षण विभाग व शासनाने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ई बुक्स स्वरूपात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार झालेल्या पाठय़पुस्तकांचे रूपांतर ई बुक्समध्ये केले जात आहे.पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी पाठांना पूरक असे ध्वनीचित्रफिती देण्यात आले आहे.पुस्तकातील कथा अँनिमेशनमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी, शिक्षण रंजक संवादात्मक आणि मनोरंजक व्हावे तसेच शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा हा या उपक्रमाचा हेतू आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे.(प्रतिनिधी)