शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आंतर मशागतीच्या कामांना वेग

By admin | Updated: July 29, 2016 00:19 IST

जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असून सर्वच शेतशिवार हिरवळीने फुलून गेले आहे.

पिकांची वाढ जोमदार : शेतकऱ्यांना कामांसाठी मिळेनात मजूर हिरापूर : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असून सर्वच शेतशिवार हिरवळीने फुलून गेले आहे. अधूनमधून पाऊसही हजेरी लावत असल्याने पिकांची जोमाने वाढ होताना दिसते. आता आंतर मशागतीच्या कामांनी वेग घेतला असून त्यामध्ये कोळपणी (डव्हरणी), निंदन, तणनाशक, कीटकनाशक फवारणींच्या कामांची लगबग सुरू आहे. मात्र शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामातील पिके ही मोसमी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टासोबतच पावसाची साथ मिळणे गरजेचे आहे. मागील हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला लावलेला खर्चदेखील निघालेला नाही. मात्र यंदा सुरुवातीपासूनच मोसमी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले संकेत दिले. त्यामुळे काही तालुक्यांत मृग नक्षत्रातच पेरणीला वेग आला होता तर त्यानंतरच्या कालखंडात काही तालुक्यात पेरणीची कामे आटोपली मात्र त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक पावसाने शेतकरी वर्ग आनंदून गेला आहे. शेतातील पिकांची चांगली वाढ होत असल्याने आंतरमशागतींच्या कामांना वेग आला आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे घरची मंडळीच सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतात राबत आहेत. त्यात सुटीच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचीदेखील थोडीफार मदत होते. निंदणाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी तणनाशक फवारणी करतात. मात्र फवारणीच्या कामासाठीदेखील पुरुष मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक नव्हे तोच दुसरे संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर) मजुरांची ने-आण शेतकऱ्यांकडे ग्रामीण भागातून दुसऱ्या गावातील शेतात मजूर न्यावयाचे झाल्यास शेतमालकाला या मजुरांची ने-आण करावयाची जबाबदारी घ्यावी लागते. सकाळी गावात वाहन नेऊन त्या ठिकाणाहून मजूर घेऊन शेतात जाणे. सायंकाळी काम संपताच मजुरांना रोख स्वरुपात मजुरी देऊन घरापर्यंत सोडावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक मजुरामागे किमान ५० रूपये खर्च येतो. मजुरीचे दर भिडले गगनाला मजुरीचे दर प्रत्येक गावात वेगवेगळे आहेत. शहरात वेगळे तर ग्रामीण भागात वेगळे आहेत त्यामुळे महिलांना निंदणीच्या मजुरीपोटी १०० ते १५० रुपयादरम्यान मजुरी मिळते तर पुरुषाच्या मजुरीचा दर हा कामावरून ठरलेला असतो. किमान १५० रुपयांपासून ते कमाल २५० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. परिणामी शेतात मजूर लावणेदेखील शेतकऱ्यांना कठीण जात आहे. मजुरांचे संघटन ग्रामीण भागात मजुरांचे संघटन केले जात आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे, तर मजुरांची संघटन करणारी व्यक्ती ही जास्तीत जास्त मोबदला देण्यास तयार असतो त्यामुळे बहुतांश मजूर अशा संघटनांमध्ये काम करण्यास तयार असतात व अधिक शेती असलेला शेतकरी एकाच दिवशी ५० ते १०० मजूर लावून कामे करून घेतात. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.