शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

शेतकऱ्यांना मिळणार वातावरण बदलाची माहिती

By admin | Updated: September 16, 2014 23:23 IST

संत्रा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना दरदिवसाच्या हवामानातील बदलाची माहिती देण्याचा प्रकल्प वरुड तालुक्यात उभारला जात आहे.

पिकांवरील रोगाचे संकेतही मिळणार : वरुड तालुक्यात संशोधन सुरुअमरावती : संत्रा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना दरदिवसाच्या हवामानातील बदलाची माहिती देण्याचा प्रकल्प वरुड तालुक्यात उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिकावर कोणत्या हवामानात कोणत्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, याचा अंदाजही शेतकऱ्यांना घेता येणार आहे. ही सर्व माहिती शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘मॅसेज’ व्दारे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा भ्रणध्वनी क्रमांक गोळा करण्याचे काम वरुड तालुक्यात सुरु आहे.येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, भारतीय औद्योगिक संस्था मुंबई, भारतीय औद्योगिक संस्था हैद्राबाद आणि महाराष्ट्र संत्रा उत्पादक संघाच्या संयुक्त विद्यमाने वरुड तालुक्यात या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या संशोधन प्रकल्पाचे अर्धेअधिक काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने २ कोटी १४ लक्ष रुपये मंजुर केले आहे. भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्यावतीने कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे, यासंदर्भात कृषी क्षेत्रातील संस्था व महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्यावतीने शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानातील बदल व पाणी आणि कीड रोग व्यवस्थापनाचा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाला भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान संशोधन संस्थेने मंजुरात प्रदान केली. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही समावेश व्हावा म्हणून भारतीय औद्योगिक संस्था, मुंबई व हैद्राबाद या संस्थांना सोबतीला दिले. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मिळावी व त्यांच्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य व्हावे म्हणून श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने महाराष्ट्र संत्रा उत्पादक संघाला सोबतीला घेतले. भूजल वापर आणि व्यवस्थापन, संत्रा पिकातील सिंचन, पाणी व्यवस्थापन व संत्रा पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन हे या प्रकल्पातील संशोधनाचे विषय आहेत. या संशोधनाचा पहिला टप्पा म्हणून वरुड तालुक्यात बारगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी रमेश जिचकार व नागझरी येथील श्रीधर सोलव यांच्या शेताची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या संत्राबागेत वायरलेस सेन्सर नेटवर्क ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ही यंत्रणा दरदिवसाच्या हवामानातील बदलाचा अचूक अंदाज घेणार आहे.गत जुलै महिन्यात तापमानातील बदलामुळे व कोलोट्रोट्रिक या बुरशीच्या प्रादुर्भावाने संत्रा फळाची अधिक गळती झाली व सध्याही सुरु आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी संशोधन प्रकल्पातंर्गत तयार केलेल्या स्वयंचलित हवामानाचा आगावू अंदाज शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रकल्पाकरिता श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत वडनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख तथा संशोधक प्रमुख अमोल झापे, सहायक संशोधक प्रमुख शशांक देशमुख हे परिश्रम घेत आहेत. हे सयंत्र स्थापित करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रमुख शास्त्रज्ञ आदिनारायण, हैदराबादचे प्रमुख शास्त्रज्ञ फनिंद्रा व त्यांच्या चमूतील सूर्यकांत सावंत, मृणालिनी बडनेरकर यांनी प्रयत्न केले.