शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

दरवर्षी वाढणारे सोयाबीन पेरणी क्षेत्र घातकच!

By admin | Updated: February 1, 2015 22:47 IST

कमी उत्पादन खर्चात व ११० दिवसांच्या कालावधीत येणारे, इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.

गजानन मोहोड - अमरावतीकमी उत्पादन खर्चात व ११० दिवसांच्या कालावधीत येणारे, इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. वारंवार तेच पीक घेत असल्याने जमिनीचा पोत खराब होऊन चक्रीभुंगा, पिवळा मोझॅक व खोडकीड सारख्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पिकासाठी घातक ठरू लागला आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात घट येत आहे. यासाठी पिकबदल होणे महत्त्वाचे असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.मागील वर्षी पेरणीपासून सततचा पाऊस व सोयाबीन मळणीच्या हंगामात परतीचा पाऊस यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांनी कमी आली. सोयाबीन डागाळले, त्याची प्रतवारी व उगवणशक्ती कमी झाली, असे सोयाबीन पेरणे धोकादायक असल्याचे कृषी विभागासह कृषी तज्ज्ञांनी सांगितले असले तरी यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले. पर्याय उपलब्ध नाही असे सांगण्यात येते, उगवणशक्तीची गॅरंटी यावेळी महाबीजनेही दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. तरीही क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा जिल्ह्यात खरीपाची ६ लाख ७९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली यापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणी क्षेत्र जवळपास ५० टक्के आहे.साधारणपणे १९९५ पासून जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढण्यास सुरूवात झाली. आता तर सोयाबीन क्षेत्राने अर्धे पेरणी क्षेत्र व्यापले आहे. याचा प्रतिकूल परिणाम सोयाबीनवरच व्हायला सुरुवात झाली आहे. वारंवार सोयाबीन पेरल्यामुळे सोयाबीनवर खोडकूज (रूटरॉट) खोडकीड (स्टेमबोअरर) व्हायरल (मोझॅक) चक्रिभुंगा (गर्डर बिडल) सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. एकच एक पीक वारंवार घेतल्याने जमिनीतील ठराविक अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात खेचल्या जातात. त्यामुळे त्या अन्नद्रव्याचे उत्पादन कमी होते हे त्या पिकासाठी, शेतासाठी घातक ठरत आहे.