शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतीसाठी सालगडी मिळेना !,करारही गेले लाखापुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी शेतीच्या कामाला ...

अमरावती : गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी शेतीच्या कामाला सुरुवात केली जाते. गुढीपाडवा जवळ आला की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आपल्या शेतीच्या कामाकरिता शेतात सालगडीची शोधाशोध सुरू होते. गुढीपाडवा सणाला शेतातील सालगड्याचा करार होऊन शेतीकामाला सुरुवात केली जाते. यावर्षी सालगड्याचा वर्षाचा पगार एक लाखाच्या पुढे गेला आहे. गतवर्षी ८५ हजार रुपयांपर्यंत सालगड्याचा करार गेला होता. यंदा मात्र यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढती महागाई लक्षात घेता आम्हाला परवडत नाही, असा सूर सालगड्यांतून निघत आहे. सालगड्याचा वर्षभराचा कौटुंबिक संसार या पैशातून चालवला जातो. सतत पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना फटका, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सालगाड्याचा पगार परवडत नसून, शेतीतील उत्पन्नही घटत चालले आहे. यामुळे शेतकरी आपली शेती भागिदारीने व निम्म्या हिशाने (बटाई) देत आहेत. शेतकऱ्यांना शेतातील कामाला सालगडी मिळत नसल्याने बैलजोडी, पशुधनाची विक्री करून ट्रॅक्टरवरील यांत्रिकीकरण शेतीकडे वळावे लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढत असून, ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. सालदाराची संख्या कमी झाल्याने शेतीच्या कामाकरिता परराज्यातून सालगडी आणावे लागत आहे.

बॉक्स

मजूर मिळेनात

शेतात वर्षभर सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा शहरातील कामाकडे त्यांचा कल आहे. छोटे-मोठे काम करून अधिक पैसे मिळत असल्याने सालगडी म्हणून काम करण्याची मानसिकता दुर्धर झाली आहे. त्यामुळे सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतीच्या कामाला दिवसाची मजुरी वाढवली आहे. पुरुषांना ५००, तर महिला शेतमजुरांना दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरी झाली आहे.