शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आसमंतात घातक वायूंचे ढग !

By admin | Updated: February 9, 2016 00:04 IST

अमरावतीकरांना ‘प्रदूषणा’ची समस्या काही नवीन नाही. वाढते ध्वनी, वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्यावर वेळोवेळी चर्चा झडत असतात.

प्रदूषण ठरतेय प्राणघातक : औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे संशोधन संदीप मानकर अमरावतीअमरावतीकरांना ‘प्रदूषणा’ची समस्या काही नवीन नाही. वाढते ध्वनी, वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्यावर वेळोवेळी चर्चा झडत असतात. परंतु वातावरणात किती घातक वायू पसरले आहेत. याची कल्पनाही सामान्यांना नसते. येथील शासकीय औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तीन वर्षे सतत धुलीकणांमधील घातक वायुंंवर अभ्यासपूर्ण संशोेधन करून सादर केलेल्या अहवालातून ही भयानकता स्पष्ट होते. वातावरणातील धुळीकणांमध्ये मागील तीन वर्षांत सल्फर आणि नायट्रोजन आॅक्साईडसह आरएसपीएमच्या (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर)प्रमाणात झालेली वाढ नाक, कान, घसा व छातीच्या वाढत्या आजारांसाठी कारणीभूत असल्याचे धक्कादायक तथ्यही या अहवालातून समोर आले आहे. शासकीय औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्नेहा रामकृष्ण तिडके व विभा अशोक रामटेके यांनी तीन वर्षे या विषयावर सतत अभ्यास केला. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणासाठी त्यांना विभागप्रमुख वैशाली नागुलवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपरोक्त दोन्ही विद्यार्थिनींनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांची अभ्यासपूर्ण आकडेवारी गोळा केली. यामध्ये शहरातील विविध भागांतील हवेतील धुळीकणांचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात आले. घातक आजारात वाढ, मनोविकाराचे १३२५ रुग्णअमरावती : यामध्ये व्हीएमव्ही परिसरातील रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी), राजकमल चौकातील वाणिज्य क्षेत्राचे सर्वेक्षण केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की, अमरावतीच्या धुळीकणांमध्ये आरएसपीएमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घातक वायुंच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन वर्षांत कान, नाक आणि घशाच्या आजारांनी बाधित तब्बल २,४३७ रुग्ण आढळले आहेत, तर छातीचे विकार (अस्थमा)ने २,२५६ रुग्ण हैराण आहेत. ८,३७२ लहान मुलांनाही विविध आजार घातक धुलिकणांमुळेच बळावल्याचे चित्र आहे. वातावरणातील धुलीकणातील घातक सल्फर व नायट्रोजन आॅक्साईडमुळे चक्क मनोविकराने बाधित १३२५ रुग्ण देखील आढळले आहेत. उपरोक्त अहवालातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर आणि तथ्यांचे सखोल अध्ययन केले असता अंबानगरीतील वाढते प्रदूषण रोखण्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची नेमकी भूमिका काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. प्लास्टिकचा कचरा पेटवू नयेदररोज निघणाऱ्या घरगुती कचऱ्याचे प्रमाण मोठे असते. त्यात अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तुंचा देखील समावेश असतो. परंतु ज्या प्लास्टिक वस्तुमध्ये घातक सीएफसी (क्लोफ्लुरोकार्बन)चे प्रमाण आहे त्या वस्तू जाळल्याने वातावरणात घातक वायू पसरतात. त्यामुळे केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट महापालिकेनेच योग्य पध्दतीने लावावी. प्रदूषणामुळे होऊ शकतात हे आजारब्राँकायटिस, क्रॉरोनिक फ्रायब्रासीस, ब्रानकोनिमोनिया, त्वचेचे विविध आजार, अस्थमा, फुफ्फुस, मनोविकार आदी आजार यामुळे बळावू शकतात. लहान मुलांच्या आरोग्यावरही यामुळे मोठा दुष्परिणाम होतो.शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार वाढले आहे. अनेकांना श्वास घेताना त्रास होतो. -श्यामसुंदर निकम, अधीक्षक, सुपरस्पेशालिटी