शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

शासकीय रुग्णालयात बारा पटींपर्यंत शुल्कवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:24 IST

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ..

आर्थिक बोजा : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना सूटअमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये म्हणजेच ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये दीड पटीपासून ते तब्बल बारा पटीपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे पण मोजके आधुनिक उपचारही राज्यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. परिणामी अनेक आधुनिक उपचारांची व त्यातही दर्जेदार उपचारांची वानवा असल्यामुळेच बहुतांश ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी उपचारासाठी यावे लागत असल्याचे रोजच सिद्ध होत आहे. जवळजवळ दहा वर्षांनंतर आरोग्य सेवेच्या रुग्ण शुल्कांमध्ये वाढ झाली आहे. बीपीएलसह काही विशिष्ट संवर्गातील व्यक्तींना पूर्वीप्रमाणे आताही सवलत आहे. मात्र इतरांसाठी ही शुल्कवाढ करताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शुल्काच्या बरोबर येण्याच्या हेतूने हे शुल्क वाढवण्यात आल्याचे ५२ पानी जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुळात यातील किती सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांप्रमाणे मिळतात, हा संशोधनाचा विषय ठरावा, अशी एकंदर स्थिती आहे. त्यातच शुल्कवाढ करताना ती थोडीबहूत करण्यात आलेली नसून चक्क दीडपट, दुप्पट, तिप्पट, चौपट आणि पाचपट आणि अगदी दहापट-बारापटही करण्यात आल्याचे स्पष्ट होते. भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी १६० रूपये शुल्क होते तर आता मात्र २ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच जॉर्इंट रिप्लेसमेंटसाठी पूर्वी ४० हजार रुपये शुल्क होते. आता हेच शुल्क ७५ हजारांपुढे गेले आहे तसेच अनेक आधुनिक व क्लिष्ट उपचार शस्त्रक्रिया निदान चाचण्यांची यादीच या ५२ पानी जीआरमध्ये जाहीर करण्यात आली असली तरी यातील अगदी अत्यल्प आधुनिक उपचार शस्त्रक्रिया चाचण्या या बोटावर मोजण्या इतक्या रुग्णालयामध्ये होतात. त्यामुळेच दररोज जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन, टीबी हॉस्पीटल, सुपर स्पेशालिटी व रुग्णालयामध्ये गाव, तालुक्यासह इतर जिल्ह्यातील तीन ते चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या असंख्य रुग्णांना दररोज विविध उपचारांसाठी अधिकृतरीत्या रेफर केले जाते. अगदी नैसर्गिक बाळंतपणासाठी किंवा छोट्या शस्त्रक्रियेसाठी रेफर केले जाते. मात्र तिथल्या तिथे रुग्णांना उपचार का केले जात नाही याचा सवाल कधीच विचारला जात नाही. त्यामुळे रुग्णालयात गोरगरिबांना आवश्यक सोईसुविधा पूर्णपणे मिळाव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. (प्रतिनिधी)रुग्ण शुल्कवाढ झाली आहे. मात्र बाहेरून औषध साहित्य आणण्यासाठी सांगितले जात नाही. ते नियमात बसत नाही व ते काटेकोरपणे पाळले जाते. - अरूण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती