शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात बारा पटींपर्यंत शुल्कवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:24 IST

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ..

आर्थिक बोजा : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना सूटअमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये म्हणजेच ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये दीड पटीपासून ते तब्बल बारा पटीपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे पण मोजके आधुनिक उपचारही राज्यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. परिणामी अनेक आधुनिक उपचारांची व त्यातही दर्जेदार उपचारांची वानवा असल्यामुळेच बहुतांश ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी उपचारासाठी यावे लागत असल्याचे रोजच सिद्ध होत आहे. जवळजवळ दहा वर्षांनंतर आरोग्य सेवेच्या रुग्ण शुल्कांमध्ये वाढ झाली आहे. बीपीएलसह काही विशिष्ट संवर्गातील व्यक्तींना पूर्वीप्रमाणे आताही सवलत आहे. मात्र इतरांसाठी ही शुल्कवाढ करताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शुल्काच्या बरोबर येण्याच्या हेतूने हे शुल्क वाढवण्यात आल्याचे ५२ पानी जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुळात यातील किती सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांप्रमाणे मिळतात, हा संशोधनाचा विषय ठरावा, अशी एकंदर स्थिती आहे. त्यातच शुल्कवाढ करताना ती थोडीबहूत करण्यात आलेली नसून चक्क दीडपट, दुप्पट, तिप्पट, चौपट आणि पाचपट आणि अगदी दहापट-बारापटही करण्यात आल्याचे स्पष्ट होते. भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी १६० रूपये शुल्क होते तर आता मात्र २ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच जॉर्इंट रिप्लेसमेंटसाठी पूर्वी ४० हजार रुपये शुल्क होते. आता हेच शुल्क ७५ हजारांपुढे गेले आहे तसेच अनेक आधुनिक व क्लिष्ट उपचार शस्त्रक्रिया निदान चाचण्यांची यादीच या ५२ पानी जीआरमध्ये जाहीर करण्यात आली असली तरी यातील अगदी अत्यल्प आधुनिक उपचार शस्त्रक्रिया चाचण्या या बोटावर मोजण्या इतक्या रुग्णालयामध्ये होतात. त्यामुळेच दररोज जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन, टीबी हॉस्पीटल, सुपर स्पेशालिटी व रुग्णालयामध्ये गाव, तालुक्यासह इतर जिल्ह्यातील तीन ते चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या असंख्य रुग्णांना दररोज विविध उपचारांसाठी अधिकृतरीत्या रेफर केले जाते. अगदी नैसर्गिक बाळंतपणासाठी किंवा छोट्या शस्त्रक्रियेसाठी रेफर केले जाते. मात्र तिथल्या तिथे रुग्णांना उपचार का केले जात नाही याचा सवाल कधीच विचारला जात नाही. त्यामुळे रुग्णालयात गोरगरिबांना आवश्यक सोईसुविधा पूर्णपणे मिळाव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. (प्रतिनिधी)रुग्ण शुल्कवाढ झाली आहे. मात्र बाहेरून औषध साहित्य आणण्यासाठी सांगितले जात नाही. ते नियमात बसत नाही व ते काटेकोरपणे पाळले जाते. - अरूण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती