शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

शासकीय रुग्णालयात बारा पटींपर्यंत शुल्कवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:24 IST

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ..

आर्थिक बोजा : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना सूटअमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये म्हणजेच ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये दीड पटीपासून ते तब्बल बारा पटीपर्यंत शुल्कवाढ करण्यात आली आहे पण मोजके आधुनिक उपचारही राज्यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. परिणामी अनेक आधुनिक उपचारांची व त्यातही दर्जेदार उपचारांची वानवा असल्यामुळेच बहुतांश ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी उपचारासाठी यावे लागत असल्याचे रोजच सिद्ध होत आहे. जवळजवळ दहा वर्षांनंतर आरोग्य सेवेच्या रुग्ण शुल्कांमध्ये वाढ झाली आहे. बीपीएलसह काही विशिष्ट संवर्गातील व्यक्तींना पूर्वीप्रमाणे आताही सवलत आहे. मात्र इतरांसाठी ही शुल्कवाढ करताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शुल्काच्या बरोबर येण्याच्या हेतूने हे शुल्क वाढवण्यात आल्याचे ५२ पानी जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुळात यातील किती सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांप्रमाणे मिळतात, हा संशोधनाचा विषय ठरावा, अशी एकंदर स्थिती आहे. त्यातच शुल्कवाढ करताना ती थोडीबहूत करण्यात आलेली नसून चक्क दीडपट, दुप्पट, तिप्पट, चौपट आणि पाचपट आणि अगदी दहापट-बारापटही करण्यात आल्याचे स्पष्ट होते. भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी १६० रूपये शुल्क होते तर आता मात्र २ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच जॉर्इंट रिप्लेसमेंटसाठी पूर्वी ४० हजार रुपये शुल्क होते. आता हेच शुल्क ७५ हजारांपुढे गेले आहे तसेच अनेक आधुनिक व क्लिष्ट उपचार शस्त्रक्रिया निदान चाचण्यांची यादीच या ५२ पानी जीआरमध्ये जाहीर करण्यात आली असली तरी यातील अगदी अत्यल्प आधुनिक उपचार शस्त्रक्रिया चाचण्या या बोटावर मोजण्या इतक्या रुग्णालयामध्ये होतात. त्यामुळेच दररोज जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन, टीबी हॉस्पीटल, सुपर स्पेशालिटी व रुग्णालयामध्ये गाव, तालुक्यासह इतर जिल्ह्यातील तीन ते चार हजार रुग्ण उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या असंख्य रुग्णांना दररोज विविध उपचारांसाठी अधिकृतरीत्या रेफर केले जाते. अगदी नैसर्गिक बाळंतपणासाठी किंवा छोट्या शस्त्रक्रियेसाठी रेफर केले जाते. मात्र तिथल्या तिथे रुग्णांना उपचार का केले जात नाही याचा सवाल कधीच विचारला जात नाही. त्यामुळे रुग्णालयात गोरगरिबांना आवश्यक सोईसुविधा पूर्णपणे मिळाव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. (प्रतिनिधी)रुग्ण शुल्कवाढ झाली आहे. मात्र बाहेरून औषध साहित्य आणण्यासाठी सांगितले जात नाही. ते नियमात बसत नाही व ते काटेकोरपणे पाळले जाते. - अरूण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती