शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये जुंपली

By admin | Updated: May 11, 2014 22:52 IST

तुकड्या वाचविण्यासाठी शिक्षकांनी डोक्याला दुपट्टे बांधून उन्हात पालकांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. शेंदूरजनाघाट येथील दोन खासगी शाळांचे शिक्षक एकाच ...

शेंदूरजनाघाट : तुकड्या वाचविण्यासाठी शिक्षकांनी डोक्याला दुपट्टे बांधून उन्हात पालकांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. शेंदूरजनाघाट येथील दोन खासगी शाळांचे शिक्षक एकाच पालकाच्या घरी एकाचवेळी गेल्याने दोघांची भंबेरी उडाली. पालकांसमोर दोन्ही शाळांच्या शिक्षकांची चांगलीच बाचाबाची झाली. एकमेकांना ओढाताण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. अखेर पालकाच्या मध्यस्थीने वाद निवळला. शिक्षणाच्या बाजारीकरणात विद्यार्थी भरकटला जाण्याची शक्यता आहे. ‘नोकरी टिकवायची असेल तर तुकड्या वाचवा’ असा फतवा शिक्षणसम्राटांनी काढला आहे. लाखो रुपये देऊन शिक्षकांनी नोकरी मिळविली. संस्था चालकांपुढे नतमस्तक होऊन नोकरी पत्करली. तीन वर्षे फुकट गेली तरीसुध्दा नशिबी निराशाच आली, अशी अवस्था तालुक्यातील खासगी आणि शासकीय शाळांतील शिक्षकांची झाली आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका शिक्षकांसह पालकांनाही बसला आहे. तालुक्यात १५८ पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालये आहेत. कॉन्व्हेंटमध्ये तर सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. व्यापारीकरणासाठी शिक्षण क्षेत्र पोषक असल्याने आता मोेठ्या लोकांनी हात टाकून ई-स्कूलची संकल्पना राबवून पालकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालविले आहे. नुकताच निकाल लागल्यानंतर खांद्यावर दुपट्टा टाकून खेडोपाडी भटकंती करुन विद्यार्थी मिळविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी पालकांची मनधरणी सुरु आहे. त्यांना आर्थिक प्रलोभने देऊन विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांनीसुध्दा वरुड तालुक्यात आपला मोर्चा वळविला. तालुक्यातील शाळा चालकांनी सळो की पळो करुन सोडले आहे. आपल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दलालांना पाचारण करुन विद्यार्थ्यामागे ५०० रुपये देऊन विद्यार्थ्याचा प्रवेश मिळविण्याचा गोरखधंदा सुरु आहे. केवळ नोकरी म्हणून सेवा देणार्‍यांच्या शाळेत विद्यार्थी संख्या रोडावत असल्याने अनेक शाळांतील तुकड्या बंद पडण्याचा संभाव्य धोका पाहता तुकडी टिकविण्यासाठी वाटेल ते करा परंतु विद्यार्थी आणा, असा फतवाच शिक्षणसम्राटांनी काढला आहे. यामुळे नोकरी टिकवायची तर शाळा टिकवा, असे आवाहन संस्थाचालकांनी नवख्या शिक्षकांना केले आहे. इयत्ता पाचवी व सातवीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी भटकंती करुन विद्यार्थी मिळविण्याचे फर्माण काढण्यात आले. यामुळे ग्रामीण भागात भटकंती करुन विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वणवण भटकंती करताना दिसत आहेत. यासाठी ग्रामीण भागात विद्यार्थ्यामागे ५०० रुपयेसुध्दा देऊन विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न असल्याने तालुक्यातील विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांकडून पळविले जातात. यामुळे तालुक्यातील शिक्षक हवालदिल झाले आहेत. पाहिजे त्याला बाटली ही पद्धतही सुरु करुन प्रवेशास बाध्य करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. स्वत:ची नोकरी टिकवायची असल्याने ४४ अंश सेल्सिअस तापमानात जीवाचे रान करुन शहरातील शिक्षक खेड्यापाड्याने दुपारी, रात्री बेरात्री वाटेल तेव्हा फिरताना दिसत आहेत. डोक्याला दुपट्टे बांधून ग्रामीण भागाचे दौरे करुन पालकांची मनधरणी सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक घाबरुन विद्यार्थी मिळविण्यासाठी जीवाचे रानं करीत आहे. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याला शहरी भागातील इंग्रजी शाळेत टाकण्याचे स्वप्न मनी बाळगल्याने ग्रामीण भागातील शाळा आता ओस पडू लागल्या आहेत. (वार्ताहर )