शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मुसाफिरांचा मुक्तसंचार! अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 10, 2014 02:27 IST

शहरात गेल्याकाही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफिर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंद वहीत या मुसाफिरांची नोंदच घेतली जात नसल्याचे

 पोलीस ठाण्यातील नोंदवह्या धूळ खात

प्रसन्न दुचक्के - अमरावती

शहरात गेल्याकाही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफिर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंद वहीत या मुसाफिरांची नोंदच घेतली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून दरोडा, चोर्‍या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही काळापासून शहरात मुसाफिरांचा मुक्तसंचारही वाढला आहे. कुठलीही परप्रांतीय व्यक्ती शहरात व्यवसायासाठी दाखल झाल्यास त्याला नियमानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंद वहीत स्वत:च्या नावाची नोंद करावी लागते. या नोंदवहीत परप्रांतीयांची नोंद करण्याची जबाबदारी जेवढी मुसाफिरांची आहे तेवढीच पोलिसांचीही आहे. परंतु पोलीस ही जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. नोंदवहीत नावे नोंदविताना पोलीस मुसाफिरांकडून एक फॉर्म भरुन घेतात. फॉर्म भरताना त्यांच्याकडील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र व फोटो आयडीच्या झेरॉक्स प्रतींची मागणी पोलिसांनी करणे गरजेचे असते. मुसाफिरांचा फॉर्म भरुन घेतल्यानंतर संबंधित मुसाफिराबद्दल तो मूळ रहिवासी असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरातील काही पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंदवह्यांमध्ये परप्रातीयांच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. या नोंदवह्या पोलीस ठाण्यांमध्ये धूूळखात पडलेल्या आहेत. पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा वार्र्षिक आढावा घेताना या मुसाफीर नोंद वहीचा आढावा घेणे आवश्यक असते. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.