शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीसाठी पिता-पुत्रच करताहेत मशागत

By admin | Updated: July 16, 2015 00:28 IST

तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात असताना यंदा दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आर्थिक संकट झाले गहिरे : मशागतीसाठी पैसा आणायचा कोठून?अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात असताना यंदा दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्याने तालुक्यातील एका पिता-पुत्राने स्वत:च मशागत सुरु केली आहे.यंदा जून महिन्यात आठ दिवस दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन महागडे बी घेऊन पेरणी केली. पेरणीवर एक महिना उलटला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. रान कोरडे पडल्यामुळे मजूर वर्गावर सुध्दा उपासमारीची पाळी आली आहे. पेरलेले बियाणे उगवण्याकरिता पाण्याची गरज असते. मात्र, पाऊसच नसल्याने आपल्या शेतातील पीक करपू नये यासाठी बैलबंडीने पाणी आणून लोट्याने पिकांना पाणी दिले जात आहे. हे कामही शेतकरी स्वत:च करीत आहेत. शेतात पेरल्यानंतर उगवलेल्या थोड्याफार पिकांवरच संसाराचा गाडा चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कसेबसे पीक हाती यावे, यासाठी पिकाला डवरणीची गरज असते. परंतु डवरणीसाठी पैसाच नसल्याने करण्याकरिता शेतकऱ्याजवळ पैसा नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पिता-पुत्र स्वत: डवरणी करीत आहेत. अशी भीषण परिस्थिती यावर्षी अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपत आहेत. वातावरणात वरुन उन्हाचा ताप व हवा ह्यांचे प्रमाण ह्याचा सर्व परिणाम शेतकऱ्यांवर तर होत आहेच परंतु ज्या शेतीच्या भरवश्यावर आपला उदर निर्वाह चालवणा मजुर वर्ग आहे त्याच्यावर आणि व्यापाऱ्यांवरही याचा फार मोठा परिणाम होत आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ह्या भागात चोरीचे प्रमाणसुध्दा वाढत आहे.बँकेमार्फत कर्जवाटपाचे शासनाकडून आदेश असतानासुध्दा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. शासनाची पुनर्गठनाची योजना थंडबस्त्यात पडली आहे. निदान कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. एकीकडे बँकांकडून होणारा असहकार आणि दुसरीकडे कोरड्या दुष्काळाच्या सावटामुळे पुढे उभे ठाकलेले संकट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा शेतांची मशागत करावी लागणार आहे. परंतु त्यासाठी पैसाच नसल्याने शेतकरी स्वत: कष्ट करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे.