शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शेती ठेक्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल !

By admin | Updated: May 30, 2016 00:38 IST

कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाला असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे.

उत्पादन खर्च वाढला : शेतकरी हवालदिलमोर्शी: कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाला असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, पावसाचे बिघडलेले अंदाज आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे हा व्यवसाय नुकसानीचा ठरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुतेक सधन शेतकरीसुद्धा आता शेती ठेक्याने देण्याचा विचार करीत आहे. ज्यांना शेती करण्याशिवाय पर्यायच नाही व घरचे चार जण शेतीत राबू शकतात, असे शेतकरी शेती ठेक्याने करून परंपरागत व्यवसाय जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.विदर्भातील ८३ टक्के शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. बहुतांश शेतकर्ऱ्याना दरवर्षी संस्थांकडून किंवा बँकांकडून शेती कर्ज घेऊनच शेती कसावी लागते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करण्याच्या अटीवर शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देते. तरीही शेतातील लागवडीचा खर्च व उत्पादनातून येणारा पैसा, याचा ताळेबंद तोट्याचाच होतो. त्यामुळे अनेक शेतकरी कजार्चे मुद्दलही भरू शकत नाही.एकदा कर्ज थकले की ते दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर भार बनून राहते. माणसोमाणसी शेती जुगार खेळल्यासारखे आहे. शेतीसाठी आवश्यक बैलजोडीच्या किंमतीही लाखावर पोहोचल्या आहे. शेतीत राबणार्ऱ्या मजुरांची टंचाई होत असल्याने मजुरीचे दरही शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. बियाणे, खते, कीटकनाशक, तणनाशक यांच्या किंमती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार्ऱ्या ठरल्या आहेत. शेतकऱ्यांची नाड बघून कृषी केंद्रांचे चालक शेतकर्ऱ्यांना लुबाडून त्यांना कंगाल करण्याच्या बेतात असल्याचेही कित्येकदा शेतकर्ऱ्यानी अनुभवले आहे. वर्षभर राब राब राबून वर्षाअखेर सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांंच्या हाती नफा शिल्लक राहतच नाही. त्यामुळे शेती ठेक्याने देऊन एकरकमी पैसा हातात पाडून घेण्याकडे शेतकर्ऱ्यांचा कल आहे.कित्येक वर्षांपासून कापसाचे भाव वाढलेले नाही. त्यामुळे कापूस पिकासाठी लागवडीचा खर्च अधिक, तर उत्पादन कमी, असा जुगार शेतकरी खेळत आहे. दोन वर्षांपासून पीक शेकऱ्यांना दगा देत आहे. सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने दुबार पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांना करता येत नाही. शेतकऱ्यांना पैशासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागते. शेती करण्यासाठी सालदार व मजुरांवर अवलंबून राहवे लागते. शेतमाल विकण्यासाठी दलाल व व्यापारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती व्यवसाय परावलंबी बनला आहे? कधीकाळी शेतकऱ्यांकडे गोधन असायचे. त्यापासूनच शेतात राबण्यासाठी बैल तयार व्हायचे. आता चारा-पाण्याची टंचाई, राखणदार गड्याची मजुरी परवडत नसल्याने शेतकऱ्यांकडे गायींची संख्या कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे बैलजोडी म्हातारी झाल्यास शेतकऱ्यांना नव्याने बैलजोडी खरेदी करावी लागते. सर्वसाधारण शेतकऱ्यांना ही खरेदी शक्यच होत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेती ठेक्याने द्यावी लागते. काळ एवढा बदलला की, शेतकऱ्यांनाही पॉकेटचे दुध विकत घेऊन चहा बनवावा लागतो. शेतात टाकायला शेणखत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)