शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

शेतकरी समूहाची कापूस लागवड

By admin | Updated: May 10, 2014 23:59 IST

कृषी विभाग, शेतकरी व खासगी कंपनी यांच्यात समन्वय होऊन शेतकरी समूह स्थापित करावे व त्या आधारे यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात येणार आहे

अमरावती : कृषी विभाग, शेतकरी व खासगी कंपनी यांच्यात समन्वय होऊन शेतकरी समूह स्थापित करावे व त्या आधारे यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात येणार आहे व उत्पादित कापूस विकत घेण्याची हमीदेखील या खासगी कंपन्या देत आहे. यासाठी शेतकर्‍यांना बियाणे व कीटकनाशके अनुदानावर मिळणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पिकासाठी हा प्रयोग मागील २ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात कापूस हे हमखास येणारे पीक असल्याने उत्पादनात वाढ व बाजारपेठेमध्ये साखळी निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यात तीन हजारांवर शेतकर्‍यांचे समूह करण्यात आले आहे. एका समूहात २० शेतकरी आहेत. या माध्यमातून दोन वर्षांत १० हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. याचप्रमाणे यंदादेखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत व राज्य शासनाच्यावतीने ही योजना राबविण्यात येते. दोन वर्षांपूर्वी शासनाने बियाणे व कीटकनाशकाकरिता अनुदान दिले होते. फक्त एका वर्षांसाठी हा प्रकल्प होता. परंतु या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना फायदा होत असल्याने प्रकल्पाला मुदतवाढ दिली आहे. (प्रतिनिधी)