शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांना मरणाची भीती अन्‌ जगण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, ...

कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, सर्व कामे बंद झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांना जगावे कसे, हा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे एकीकडे मरणाची भीती तर दुसरीकडे जगण्याची चिंता वाढली आहे.

साधारणत: उन्हाळ्याच्या दिवसांत घराचे बांधकाम तसेच अनेक कामे उपलब्ध असतात. परंतु, अनेक दिवसांपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता होती. त्यात शेतमजुरांना कामाची मुभा देण्यात आली होती. परंतु, एकीकडे कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढल्यामुळे मजुरांच्या मनात भीती निर्माण झाली. परिणामी त्यांनी कामावर जाणे टाळले. परंतु, जगण्यासाठी कमावण्याशिवाय अनेक मजुरांकडे पर्याय नाही. त्यामुळे मिळेल त्या कामावर ते जात होते. आता मात्र कडक लॉकडाऊन असल्याने कामावर जावे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

ना शेतमजुरी, ना धान्य

धामणगाव रेल्वे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात भुईमूग, तीळ, मूग तसेच कांदा पिकांची पेरणी करण्यात आली. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना लॉकडाऊनमुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. उन्हाळी पिके काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना बाहेरगावाहून ज्यादा मजुरी देऊन मजूर आणावा लागत आहे.

अनेक नागरिक भाजीपाला तसेच किराणा वेळेवर घेऊन आपली उपजीविका भागवितात. परंतु जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, सर्व फेरीवाले बंद केल्याने हातावर आणणे व पानावर खाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे.