शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

शेतमजुरांना मरणाची भीती अन्‌ जगण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, ...

कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, सर्व कामे बंद झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांना जगावे कसे, हा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे एकीकडे मरणाची भीती तर दुसरीकडे जगण्याची चिंता वाढली आहे.

साधारणत: उन्हाळ्याच्या दिवसांत घराचे बांधकाम तसेच अनेक कामे उपलब्ध असतात. परंतु, अनेक दिवसांपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता होती. त्यात शेतमजुरांना कामाची मुभा देण्यात आली होती. परंतु, एकीकडे कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढल्यामुळे मजुरांच्या मनात भीती निर्माण झाली. परिणामी त्यांनी कामावर जाणे टाळले. परंतु, जगण्यासाठी कमावण्याशिवाय अनेक मजुरांकडे पर्याय नाही. त्यामुळे मिळेल त्या कामावर ते जात होते. आता मात्र कडक लॉकडाऊन असल्याने कामावर जावे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

ना शेतमजुरी, ना धान्य

धामणगाव रेल्वे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात भुईमूग, तीळ, मूग तसेच कांदा पिकांची पेरणी करण्यात आली. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना लॉकडाऊनमुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. उन्हाळी पिके काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना बाहेरगावाहून ज्यादा मजुरी देऊन मजूर आणावा लागत आहे.

अनेक नागरिक भाजीपाला तसेच किराणा वेळेवर घेऊन आपली उपजीविका भागवितात. परंतु जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, सर्व फेरीवाले बंद केल्याने हातावर आणणे व पानावर खाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे.