शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
4
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
5
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
6
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
7
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
8
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
9
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
10
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
11
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
12
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
13
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
14
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
15
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
16
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
17
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
18
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
19
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
20
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

शेतमजुरांना मरणाची भीती अन्‌ जगण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, ...

कावली वसाड : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, सर्व कामे बंद झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांना जगावे कसे, हा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे एकीकडे मरणाची भीती तर दुसरीकडे जगण्याची चिंता वाढली आहे.

साधारणत: उन्हाळ्याच्या दिवसांत घराचे बांधकाम तसेच अनेक कामे उपलब्ध असतात. परंतु, अनेक दिवसांपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता होती. त्यात शेतमजुरांना कामाची मुभा देण्यात आली होती. परंतु, एकीकडे कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढल्यामुळे मजुरांच्या मनात भीती निर्माण झाली. परिणामी त्यांनी कामावर जाणे टाळले. परंतु, जगण्यासाठी कमावण्याशिवाय अनेक मजुरांकडे पर्याय नाही. त्यामुळे मिळेल त्या कामावर ते जात होते. आता मात्र कडक लॉकडाऊन असल्याने कामावर जावे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

ना शेतमजुरी, ना धान्य

धामणगाव रेल्वे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात भुईमूग, तीळ, मूग तसेच कांदा पिकांची पेरणी करण्यात आली. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना लॉकडाऊनमुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. उन्हाळी पिके काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना बाहेरगावाहून ज्यादा मजुरी देऊन मजूर आणावा लागत आहे.

अनेक नागरिक भाजीपाला तसेच किराणा वेळेवर घेऊन आपली उपजीविका भागवितात. परंतु जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, सर्व फेरीवाले बंद केल्याने हातावर आणणे व पानावर खाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे.