शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचा निधीवर डोळा

By admin | Updated: May 11, 2016 00:38 IST

गावाशेजारील जंगलांचे सरंक्षण करण्यासह वन्यपशुंबद्दल आस्था निर्माण व्हावी,...

उद्दिष्टांना हरताळ : १५ हजार ९०० गावांत ‘रिझल्ट’ शून्यअमरावती : गावाशेजारील जंगलांचे सरंक्षण करण्यासह वन्यपशुंबद्दल आस्था निर्माण व्हावी, यासाठी राज्यात १५ हजार ९०० गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठन करण्यात आले आहे. मात्र, निधीवर डोळा ठेवून या समित्या काम करीत असल्याने जंगल आणि वन्यपशुंचा संरक्षण ‘रिझल्ट’ शून्य आहे. हल्ली विदर्भात वणव्याने जंगल आणि वन्यपशू होरपळून खाक होत असताना या समित्या कोठेही कार्यरत दिसत नाहीत. सन १९७२ पर्यंत राज्यातील शतप्रतिशत दावे ‘वनग्राम’ च्या अधिपत्याखाली निकाली निघत होती. वन विभागातून महसूल विभागाची निर्मिती झाल्यानंतर खेड्यांवर महसूल विभागाचा वरचष्मा वाढला. पर्यायाने ग्रामस्थांची जंगलांविषयी आपुलकीची भावना लोप पावली. या मानसिकतेतून ग्रामस्थांनी जंगलात अतिक्रमण, स्मशानभूमिसाठी जागा, वन्यपशुंच्या शिकारी, अवैध वृक्षतोड, वनचराई, वनक्षेत्राला लागणाऱ्या आगी यासर्व बाबींवर अंकुश लावण्यासाठी राज्यभरात संयुक्त वनव्यवस्थापन समितींचे गठन करण्यात आले. तसेच व्याघ्र प्रकल्पांच्या हद्दीत ईको टुरिझम समिती गठित करण्यात आल्या आहेत. प्रारंभी सात हजार गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर राज्यभरात जंगलाशेजारील १५ हजार ९०० गावांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. मात्र, या समित्यांनी जंगल आणि वन्यपशुंचे संरक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करणे अपेक्षित होते. परंतु ज्या गावात या समित्यांचे गठन करण्यात आले, त्या गावांमध्ये समित्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने योजनांवर कोट्यवधी रूपयांचा चुराडा केला आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयानुसार गाव सक्षमीकरणासाठी वनविभागाने पुढाकार घेतला. यात गावकऱ्यांना गॅस वितरण, दुधाळ जनावरांचे वाटप, शेळ्या व गुरांचे वाटप, लग्नप्रसंगी आवश्यक साहित्य देणे, सौर ऊर्जेवरील साहित्य वाटप, गुरांचे मोफत लसीकरण, पथदिव्यांची निर्मिती, रस्त्यांची निर्मिती करणे, पाणीपुरवठा आदी. या समितींतर्गत गावकऱ्यांसाठी सार्वजनिक हिताच्या योजना वनविभागाने राबविल्या. मात्र, जंगल आणि वन्यपशुंच्या संरक्षणासाठी या समितीने भरीव कामगिरी केलेली नाही. परिणामी दरवर्षी वणव्यात हजारो हेक्टर जंगल खाक होत असताना ही समिती कोठेही दिसून येत नाही. तसेच वन्यपशुंची शिकार ही नित्याचीच बाब असता शिकारी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने पुढाकार का घेतला नाही? ही चिंतनीय बाब आहे. समितीचे केवळ योजना लाटण्यापुरतेच अस्तित्व जाणवत आहे. (प्रतिनिधी)वनहक्क कायदा ठरतोय धोकादायक वनातील गौण वनउपज, बांबू, लाकूड फाटा, मोहा फूल, तेंदू पाने लाख हे वन उत्पादन गोळा करणे आणि त्याची बाजारात विक्री करणे यासाठी विदर्भातील काही गावांमध्ये वनहक्क समिती गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडे गावांशेजारील जंगल अधिकृतरित्या ताब्यात देण्यात आले आहे. परंतु गावकऱ्यांमध्ये वनांबद्दलची मानसिकता बदलल्याने भविष्यात वनांना धोका संभवतो. ज्या वनक्षेत्रावर वनविभागाचा अधिकार चालतो, त्या क्षेत्रावर या समित्या हक्क गाजवीत असल्याने गावकरी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.हे आहे समितीचे कर्तव्यसंयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठन केलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नजीकच्या जंगलात आग लागल्यास ती विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करणे बंधनकारक आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी विदर्भात टिपेश्वर, मेळघाट, ताडोबा, पेंच जंगलांना आगी लागूनही समिती वा ग्रामस्थ कोठेही दिसून आले नाही.शासन निर्णयानुसार संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे गठन केले आहे. जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक समित्या आहेत. या समित्यांचे कार्य बघून त्यांना ए,बी,सी अशी वर्गवारी दिली जाणार आहे. वर्गवारीचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविला जाईल.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.