शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

पर्यावरण संतुलित योजनेचा फज्जा

By admin | Updated: May 9, 2014 00:58 IST

गावाच्या संपूर्ण विकासासाठी अनेकदा निधीची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतून संपूर्ण विकासासाठी भरघोस निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो.

समित हरकुट ■ चांदूरबाजारगावाच्या संपूर्ण विकासासाठी अनेकदा निधीची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतून संपूर्ण विकासासाठी भरघोस निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो. मात्र, यंत्रणेतील ग्रामपंचायतींच्या उदासीन धोरणामुळे या योजनेचे बारा वाजले आहेत. तालुक्यात एकूण १७१ गावे असून २४ गावे उजाड आहेत. १४३ गावे आबाद आहेत. मात्र, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या तिसर्‍या वर्षी तालुक्यातील एकही गाव पात्र ठरले नाही, ही या तालुक्याची शोकांतिका आहे. तालुक्यात योजनेचा प्रारंभ २00९-१0 मध्ये झाला होता. या योजनेमध्ये पहिल्या वर्षी सहभागी होण्यासाठी गावाची ६0 टक्के करवसुली, गावात ६0 टक्के हागणदारीमुक्ती, लोकसंख्येच्या तुलनेत ५0 टक्के वृक्षलागवड, दुसर्‍या वर्षी ८0 टक्के करवसुली, ८0 टक्के शौचालयांचा वापर, लोकसंख्येच्या तुलनेत ७५ टक्के वृक्षलागवड व घनकचरा व्यवस्थापन तर तिसर्‍या वर्षी ९0 टक्के करवसुली, १00 टक्के शौचालयांचा वापर, १00 टक्के वृक्षलागवड व २ टक्के बायोगॅसचा वापर याप्रमाणे या गावांची योजनेंतर्गत निवड केली जाते. पात्र गावांना तीनही वर्षी गावातील लोकसंख्येच्या तुलनेत बक्षिसे दिली जातात. या योजनेला प्रारंभ झाला त्यावर्षी म्हणजे २00९-१0 मध्ये तळवेल व वणी या गावांची निवड करण्यात आली होती. वर्ष २0१0-११ यावर्षीसुध्दा बेलोरा, बेसखेडा, बोरगाव मोहना, तुळजापूर गढी व निमखेड या गावांची निवड करण्यात आली होती. वर्ष २0११-१२ मध्येसुध्दा प्रथम वर्षाकरिताच आसेगाव, बेलज, कलडोही व रसुलापूर या गावांची निवड करण्यात आली होती. तीनही वर्षांमध्ये प्रथम वर्षी एकूण ११ गावांची निवड करण्यात आली. मात्र, या गावांपैकी २ गावे दुसर्‍या वर्षासाठी पात्र ठरली. त्यामध्ये बेलोरा व निमखेडचा समावेश आहे. तर तिसर्‍या वर्षाकरिता एकही गाव योजनेसाठी पात्र ठरले नाही. चालू वर्षासाठी म्हणजे सन २0१३-१४ मध्ये सुध्दा पंचायत समितीने एकूण ९ गावे प्रस्तावित केलेली आहेत. यामध्ये विश्रोळी, सर्फापूर, खरवाडी, निंभोरा, राजुरा, सोनोरी, सर्फाबाद, रतनपूर, गोविंदपूर या गावांची पहिल्या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. या गावांमधू द्वितीय व तृतीय वर्षामध्ये किती गावे पात्र ठरतात, याकडे तालुक्यांचे लक्ष लागले आहे. योजनेतून गावातील विकास कामांसाठी तीन टप्प्यांमध्ये निधी दिला जातो. स्पर्धात्मक स्वरूपाची ही योजना आहे. प्रत्येक टप्प्यासाठी शासनाकडून निकष घालून देण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता केल्यास गावात भरघोस विकास निधी उपलब्ध होऊ शकतो. असे असतानाही तालुक्यातील ग्रामपंचायतींची उदासीनता डोळ्यात खुपणारी आहे. या योजनेचे महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून देण्यात अद्यापपावेतो यंत्रणेला यश आलेले नाहीत.पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद