शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

आठ तालुके वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:28 IST

गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये व दोन हेक्टर मर्यादेत हा निधी वितरित होईल. यापैकी पहिल्या टप्प्याच्या ५५.२२ कोटींचा निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देपाच तालुक्यांना २७० कोटी : दुष्काळसदृश जाहीर १६ मंडळांसह १०२० गावांना डावलले

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये व दोन हेक्टर मर्यादेत हा निधी वितरित होईल. यापैकी पहिल्या टप्प्याच्या ५५.२२ कोटींचा निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.जिल्ह्यात ३१ आॅक्टोबर २०१८ चे शासन निर्णयाप्रमाणे मोर्शी तालुक्यात तीव्र स्वरूपाचा व अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरूड, धारणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. याव्यतिरिक्त ६ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयाप्रमाणे १६ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृशस्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती देण्यात आल्यात. मात्र, या १६ महसूल मंडळांना दुष्काळ निधीमधून डावलण्यात आलेले आहेत. यंदाचा खरीप हंगाम बाधित झाल्याने धारणी वगळता जिल्ह्यातील १ हजार ८०५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यांव्यतिरिक्त १ हजार २० गावांना या मदतनिधीपासून डावलण्यात आल्याची बाब आता स्पष्ट झालेली आहे.शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत दोन टप्प्यात मदतनिधीचे वाटप होणार आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे प्रतिहेक्टर सहा हजार ८०० रूपयांच्या ५० टक्के म्हणजेच ३ हजार ४०० रूपये प्रति हेक्टर किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास प्रतिहेक्टर देय १८ हजार रूपयांपैकी पहिल्या टप्प्यात ९ हजार किंवा किमान दोन यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती पीक बाधित शेतकºयाला प्रदान करण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच देण्यात येणार असल्याचे महसूल विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.दुष्काळी तालुक्यांना निधी जाहीरमदतनिधीतून कर्जकपात नाहीमदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामधून कोणत्याही बँकेला कुठल्याच प्रकारची वसुली करता येणार नसल्याची बाब महसूल विभागाने स्पष्ट केली आहे.बहुवार्षिक पिकांसाठी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याची खातरजमा पंचनाम्याम्याद्वारे करण्यात येईल. मात्र, यासोबत जीपीएस इनबिल्ट फोटो आवश्यक राहणार आहे.३३ टक्के बाधित क्षेत्र ठरविण्यासाठी अंतिम पैसेवारीसाठी झालेल्या पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नाचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतनिहाय काढण्यात आलेले उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहेत.१ हजार २० गावांवर अन्यायदुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरूड व मोर्शी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. याच गावांना मदतनिधी मिळेल. ६ नोव्हेंबरला ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या आधारावर १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली. या मंडळांना यातून डावलले. याव्यतिरिक्त कमी पैसेवारीच्या पाच दुष्काळ तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांतील १०२० गावांना मदतनिधीतून डावण्यात आलेले आहे.