शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न!

By admin | Updated: June 11, 2016 00:14 IST

तालुक्यातील मागील तीन वर्षांच्या खरीप पिकांचा आढावा घेतला असता उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन पिकास सर्वाधिक फटका बसला आहे.

तालुका कृषी कार्यालय : कपाशीचा पेरा वाढणारचांदूरबाजार : तालुक्यातील मागील तीन वर्षांच्या खरीप पिकांचा आढावा घेतला असता उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. निसर्ग, दुष्काळ यासोबत पिकावरील येणाऱ्या किडी व रोग तसेच वर्षानुवर्षे शेतात एकच एक पीक पेरल्या गेल्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होऊन सोयाबीन उत्पादक शेतकरी आज देशोधडीला लागला असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे. याचा जाणिवपूर्वक विचार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून खरीप २०१६-१७ या हंगामासाठी सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनांतर्गत स्थानिक कृषी कार्यालयाकडून सोयाबीन पिकाचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल कपाशी, तूर, उडीद, मूंग या पिकांकडे अधिक प्रमाणात झुकला असल्याचे दिसून येते. परिणामी याचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा पीक काढणीनंतर शेतकऱ्यांनाच होणार आहे, ही शक्यताही नाकारता येत नाही. तालुका कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनानुसार येत्या खरिपाकरिता पीकनिहाय करण्यात आलेल्या नियोजनात कपाशी २१ हजार हेक्टर, सोयाबीन १८ हजार हेक्टर, तूर १३ हजार हेक्टर, मुंग ३ हजार २०० हेक्टर, खरीप ज्वारी २ हजार हेक्टर, उडीद ४०० हेक्टर याप्रमाणे एकूण ५७ हजार ६०० हेक्टर पिकाखालील क्षेत्रासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष पेरणी करताना पावसाच्या आगमनाची वेळ पाहून शेतकऱ्यांकडून पेरणीबदल घडून येण्याची दाट शक्यता असते. हे जरी खरे असले तरी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून तूर पिकाचा पेरा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात तूर पिकाचा पेरा १६ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तूर पीक हे मुख्य पीक ठेवून या पिकात आंतरपीक म्हणून पहिली पसंती उडीद, दुसरी मूंग व तिसरा क्रमांक सोयाबीन पिकास शेतकऱ्यांकडून मिळत आहे. तसेच सध्या कपाशीला मिळत असलेले बाजारभाव पाहता शेतकऱ्यांचा कल कापूस पिकाकडेही वाढू शकतो.तालुक्यातील एकूण पेरणी योग्य क्षेत्र ६५ हजार ९२७ हेक्टर असून यातील ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र हे खरीप पिकाखाली पेरणीस वापरण्यात येते. उर्वरित १० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर ५ वर्षांवरील संत्राझाडे असून २ हजार हेक्टर क्षेत्र रबीसाठी राखीव ठेवला जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात या संपूर्ण क्षेत्रावर १७२ गावे वसली असून यातील ११६ गावे आबाद व ५६ गावे उजाड आहेत. पेरणी खालील क्षेत्राचे वहिवाट करून एकूण ४३ हजार ५८५ शेतकरी करीत असून यात १७ हजार ३८२ अल्पभूधारक, १२ हजार ८०० अत्यल्पभूधारक तर १३ हजार ३९६ मोठे शेतकरी यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)