शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

सोयाबीनचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न!

By admin | Updated: June 11, 2016 00:14 IST

तालुक्यातील मागील तीन वर्षांच्या खरीप पिकांचा आढावा घेतला असता उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन पिकास सर्वाधिक फटका बसला आहे.

तालुका कृषी कार्यालय : कपाशीचा पेरा वाढणारचांदूरबाजार : तालुक्यातील मागील तीन वर्षांच्या खरीप पिकांचा आढावा घेतला असता उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. निसर्ग, दुष्काळ यासोबत पिकावरील येणाऱ्या किडी व रोग तसेच वर्षानुवर्षे शेतात एकच एक पीक पेरल्या गेल्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होऊन सोयाबीन उत्पादक शेतकरी आज देशोधडीला लागला असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे. याचा जाणिवपूर्वक विचार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून खरीप २०१६-१७ या हंगामासाठी सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनांतर्गत स्थानिक कृषी कार्यालयाकडून सोयाबीन पिकाचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल कपाशी, तूर, उडीद, मूंग या पिकांकडे अधिक प्रमाणात झुकला असल्याचे दिसून येते. परिणामी याचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा पीक काढणीनंतर शेतकऱ्यांनाच होणार आहे, ही शक्यताही नाकारता येत नाही. तालुका कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनानुसार येत्या खरिपाकरिता पीकनिहाय करण्यात आलेल्या नियोजनात कपाशी २१ हजार हेक्टर, सोयाबीन १८ हजार हेक्टर, तूर १३ हजार हेक्टर, मुंग ३ हजार २०० हेक्टर, खरीप ज्वारी २ हजार हेक्टर, उडीद ४०० हेक्टर याप्रमाणे एकूण ५७ हजार ६०० हेक्टर पिकाखालील क्षेत्रासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष पेरणी करताना पावसाच्या आगमनाची वेळ पाहून शेतकऱ्यांकडून पेरणीबदल घडून येण्याची दाट शक्यता असते. हे जरी खरे असले तरी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून तूर पिकाचा पेरा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात तूर पिकाचा पेरा १६ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तूर पीक हे मुख्य पीक ठेवून या पिकात आंतरपीक म्हणून पहिली पसंती उडीद, दुसरी मूंग व तिसरा क्रमांक सोयाबीन पिकास शेतकऱ्यांकडून मिळत आहे. तसेच सध्या कपाशीला मिळत असलेले बाजारभाव पाहता शेतकऱ्यांचा कल कापूस पिकाकडेही वाढू शकतो.तालुक्यातील एकूण पेरणी योग्य क्षेत्र ६५ हजार ९२७ हेक्टर असून यातील ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र हे खरीप पिकाखाली पेरणीस वापरण्यात येते. उर्वरित १० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर ५ वर्षांवरील संत्राझाडे असून २ हजार हेक्टर क्षेत्र रबीसाठी राखीव ठेवला जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात या संपूर्ण क्षेत्रावर १७२ गावे वसली असून यातील ११६ गावे आबाद व ५६ गावे उजाड आहेत. पेरणी खालील क्षेत्राचे वहिवाट करून एकूण ४३ हजार ५८५ शेतकरी करीत असून यात १७ हजार ३८२ अल्पभूधारक, १२ हजार ८०० अत्यल्पभूधारक तर १३ हजार ३९६ मोठे शेतकरी यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)