शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात दरड कोसळण्याची भीती, पर्यटकांना धोक्याची संभावना

By admin | Updated: August 5, 2015 00:34 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

लोकमत विशेषनरेंद्र जावरे चिखलदराविदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत दरड कोसळून येथे मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवडाभरापूर्वी दरडीचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मेळघाटातील अनेक रस्त्यांवर पहाड खचण्याची भीती वर्तविली जात आहे.मेळघाटातील नागमोडी रस्ते दऱ्याखोऱ्यातून असल्याने रस्त्याच्या एकीकडे कुठे दरी तर दुसरीकडे पहाड अशी भौगोलिक स्थिती आहे. अशातच रस्त्याने ये-जा करणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांसाठी हे रस्ते जीवघेणे ठरले आहे. चिखलदरा तालुका विस्तीर्ण असला तरी तालुक्यातील बिहाली ते घटांग, घटांग ते कुकरु (मध्य प्रदेश), घटांग ते सेमाडोह, चिखलदरा ते आमझरी, मडकी ते लाँगपॉर्इंट या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. याच रस्त्यांवर पावसाळ्याच्या दिवसांत दरड कोसळण्याची भीती आहे.अरुंद रस्ते ठरतेय जीवघेणेमेळघाटातील अरुंद रस्ते वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभाग रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहे. रस्त्याच्या कडेला पटरीवर माती टाकण्यासाठी दोन्ही बाजूने मातीचे खोदकाम केले जात आहे. परिणामी टेकडीला कपारी पडत आहे. त्या कपारीवरील झाडे आणि मोठे दगड उघडे पडत असल्याने झिरपलेल्या पाण्यामुळे दरड कोसळण्याची सर्वाधिक भीती आहे. हा सर्व प्रकार मेळघाटात दिसून येतो.पर्यटकांना सावधानतेचा इशाराघटांग ते काटकुंभ मार्गावर मागील मंगळवारी पहाटे ४ वाजता अचानक दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने मोठा अपघात टळला. पावसाळ्यात चिखलदरा, सेमाडोह, कुकरु या पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. पावसात ओलेंचिंब होऊन निसर्गसौंदर्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. स्वत:च्या दुचाकी, चारचाकी वाहने बेधुंद वाहनचालविण्याची स्पर्धा या नागमोडी रस्त्यांवर जीवघेणी ठरत आहे. अशा पर्यटकांनी रस्त्याच्या कपारीवर लक्ष देऊन वाहन चालविणे गरजेचे आहे.एकच मार्ग सहा ठिकाणी धोकादायकघटांग-काटकुंभ मार्गावर दरड कोसळल्यावर याच मार्गावर बंसी टर्न या पाऊण किलोमीटरच्या परिसरात सहा ठिकाणे अत्यंत धोकादायक ठरले आहे. मोठ्या प्रमाणात केव्हाही दरड कोसळून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.महाकाय वृक्षांची अवैध कत्तलधारणी-चिखलदरा या दोन्ही तालुक्यात घाटवळणाचे रस्ते आहेत. परंतु मार्गावरील महाकाय वृक्ष अवैधपणे तोडण्यात येत असल्याने दरड कोसळण्याला तेसुध्दा कारणीभूत ठरत आहेत. वृक्षांची जड माती पकडून ठेवत असल्याने धोका कमी प्रमाणात असते. मात्र, अवैध वृक्षतोड करताना बुंंध्यापर्यंत झाड कापल्याने मातीची पकड कमजोर होऊन दरड कोसळते.\\असा पडतो पाऊसचिखलदरा पर्यटनस्थळावर रिमझिम तर कधी धो-धो पाऊस कोसळतो. मात्र, मेळघाटच्या घनदाट अरण्यात संततधार व झिरपणारा पाऊस दरड कोसळण्यास कारणीभूत ठरत आहे. पावसाने सोमवारी हजेरी लावली. दोन दिवसांत डोंगरदऱ्यावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. अशातच रस्त्याच्या कपारीची माती वाहून जात आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची भीती वाटत आहे.