शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

भूकंपामुळे 'लँगटँग' पर्वताची उंची घसरली

By admin | Updated: May 14, 2015 23:59 IST

भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीहिमालयन थ्रस्ट फॉल्टमुळे नेपाळ येथे भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. या भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मी.ने पश्चिम-पूर्व बाजूने सरकत आहे. तसेच युरेशियन भूगाग हा भारताच्या भूभागकडे सरकत असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत. दोन्ही भूगाग एकेमकांना ढकलत असल्यामुळे मधल्या भूभागावर दाब निर्माण झाला आहे. दोन्ही भूगाग एकमेकांकडे सरकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसणे ही अपेक्षित आणि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मत भूगर्भशास्त्र संशोधकांचे आहे. या प्रक्रियेला संशोधक 'टेक्टॉनिक अ‍ॅक्टिव्हिटी' असे संबोधतात. ४० ते ५५ मिलीयन वर्षांपूर्वीपासून भारताचा भूगाग ५ हजार किलोमीटरने सरकल्यावर युरेशियन भूगागाला जाऊन टेकला. त्यामुळे हिमालय पर्वतरांगांसोबतच तिबेट व नेपाळचाही भूभाग तयार झालेला आहे. नेपाळमधील काठमांडू दाबपट्ट्यातील प्रदेश असून तेच भूकंपाचे मुख्य केंद आहे. भूकंप केंद्रबिंदूच्या पूर्वेकडे ८ हजार ८४८ मीटर उंचीचा एव्हरेस्ट पर्वत आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांवर लँगटँग व गणेश हिमल नावाचा भाग आहे. काठमांडू व अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपानंतर संशोधकाने जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हिमालयाची उंची जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये लँगटँग पर्वताचा ८० ते १०० किलोमीटरच्या भूगागाची उंची १ मीटरने कमी झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी नोंदविला. गणेश हिमलची उंचीसुध्दा एक ते दीड मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज जर्मन एअर स्पेस सेंन्टरचे संशोधक स्वीस्टीयन मिनेट यांनी वर्तविला आहे. मात्र, एव्हरेस्टच्या उंचीबद्दल अद्यापपर्यंत संशोधकांनी काही निष्कर्ष काढला नसून त्यावर संशोधन सुरू आहे, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख सैय्यद खादरी यांनी दिली. खादरी हे भूगर्भशास्त्राचे आंतरराष्ट्रीय संशोधक आहेत. ४० ते ५५ मिलियन वर्षांपूर्वी नार्थ इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला जाऊन टेकल्याने हिमालयासह नेपाळ व तिबेटची निर्मिती झाली. भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मीटरने सरकत आहे. ही प्रक्रिया निरतंर सुरुच आहे. त्यामुळे नेपाळ व भारतामध्ये भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. 'थ्रस्ट फॉल्ट'मुळे दोन्ही भूगागाच्या सीमांवर दबाव वाढत असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसत आहेत. - सैय्यद खादरी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.