शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

भूकंपामुळे 'लँगटँग' पर्वताची उंची घसरली

By admin | Updated: May 14, 2015 23:59 IST

भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीहिमालयन थ्रस्ट फॉल्टमुळे नेपाळ येथे भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. या भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मी.ने पश्चिम-पूर्व बाजूने सरकत आहे. तसेच युरेशियन भूगाग हा भारताच्या भूभागकडे सरकत असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत. दोन्ही भूगाग एकेमकांना ढकलत असल्यामुळे मधल्या भूभागावर दाब निर्माण झाला आहे. दोन्ही भूगाग एकमेकांकडे सरकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसणे ही अपेक्षित आणि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मत भूगर्भशास्त्र संशोधकांचे आहे. या प्रक्रियेला संशोधक 'टेक्टॉनिक अ‍ॅक्टिव्हिटी' असे संबोधतात. ४० ते ५५ मिलीयन वर्षांपूर्वीपासून भारताचा भूगाग ५ हजार किलोमीटरने सरकल्यावर युरेशियन भूगागाला जाऊन टेकला. त्यामुळे हिमालय पर्वतरांगांसोबतच तिबेट व नेपाळचाही भूभाग तयार झालेला आहे. नेपाळमधील काठमांडू दाबपट्ट्यातील प्रदेश असून तेच भूकंपाचे मुख्य केंद आहे. भूकंप केंद्रबिंदूच्या पूर्वेकडे ८ हजार ८४८ मीटर उंचीचा एव्हरेस्ट पर्वत आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांवर लँगटँग व गणेश हिमल नावाचा भाग आहे. काठमांडू व अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपानंतर संशोधकाने जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हिमालयाची उंची जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये लँगटँग पर्वताचा ८० ते १०० किलोमीटरच्या भूगागाची उंची १ मीटरने कमी झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी नोंदविला. गणेश हिमलची उंचीसुध्दा एक ते दीड मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज जर्मन एअर स्पेस सेंन्टरचे संशोधक स्वीस्टीयन मिनेट यांनी वर्तविला आहे. मात्र, एव्हरेस्टच्या उंचीबद्दल अद्यापपर्यंत संशोधकांनी काही निष्कर्ष काढला नसून त्यावर संशोधन सुरू आहे, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख सैय्यद खादरी यांनी दिली. खादरी हे भूगर्भशास्त्राचे आंतरराष्ट्रीय संशोधक आहेत. ४० ते ५५ मिलियन वर्षांपूर्वी नार्थ इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला जाऊन टेकल्याने हिमालयासह नेपाळ व तिबेटची निर्मिती झाली. भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मीटरने सरकत आहे. ही प्रक्रिया निरतंर सुरुच आहे. त्यामुळे नेपाळ व भारतामध्ये भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. 'थ्रस्ट फॉल्ट'मुळे दोन्ही भूगागाच्या सीमांवर दबाव वाढत असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसत आहेत. - सैय्यद खादरी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.