शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक द्रव्यामुळे फळांचा राजा झाला विषारी

By admin | Updated: April 21, 2015 00:06 IST

सर्व फळांचा राजा असलेल्या आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : अन्न व औषधी प्रशासन उदासीनसुरेश सवळे चांदूरबाजारसर्व फळांचा राजा असलेल्या आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आंब्याच्या सेवनापासून मनुषाला अनेक फायदे होत असतात. परंतु आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यामुळे आता फळांचा राजा विषारी झाला आहे.आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षांपासून आंब्याचे महत्त्व पटवून दिले होते. त्यासाठी गावाशेजारी नदी नाल्याच्या काठावरील शेतावर त्यांनी आम्रवृक्ष लावून ठेवले होते. तालुक्यातील अनेक गावे आमराईसाठी सर्व परिचित होते. या परिसरात मोठ्या आम्रवृक्षांचे वन मोठ्या प्रमाणात दिसत होते. परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या वृक्षतोडीमुळे ग्रामीण भागातील अनेक आमराया नामशेष झालेल्या दिसत आहेत. पूर्वी आंब्याला तणस, गवत किंवा झाडपाल्याचा वापर करुन पिकविले जात असायचे. त्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गुण टिकून राहत होते. परंतु आता झटपट पैसे कमविण्याच्या नादात फळविक्रेते आंबे पिकविण्यासाठी कृत्रिम पध्दतीने रासायनिक पावडरचा वापर करीत असल्याने मानवाला अनेक आजाराने घेरलेले दिसत आहे. त्यामुळे फळांचा राजा आंबा हा गुणकारी नसून विषारी झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात आंब्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. पाहुण्यासाठी पाहुणचार म्हणजे आंब्याच्या रसाची मेजवानी असते. विविध नावाने प्रसिध्द असलेल्या आंब्यांना विशेष मागणी असते. परंतु आंबा पिकविण्यासाठी रासायानिक कारपेटचा वापर करण्यात येतो. आंबे पिकविले जातात. याकडे अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या या मवाळ धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहे. या आंब्यांच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. निर्यातबंदी झाल्यामुळे बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आंब्याच्या किमती कमी झाल्याचे दिसते. मात्र आंबा ज्या नैसर्गिक पद्धतीने पिकवायला पाहिजे त्या पध्दतीने न पिकविता रासायानिक द्रव्य किंवा कारपेटचा वापर करुन आंबे पिकविले जातात. त्यामुळे बाजारपेठेत आंबे स्वस्त असली तरी प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या आंब्याच्या सेवनाने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे, हे त्यांच्या उदासीन कार्यप्रणालीवरुन दिसून येत आहे.ग्रामीण भागात रासायनिक प्रक्रिया करुन पिकविलेली फळे सर्रास पिकविली जात असताना आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी अशी फळे तपासणीसाठी इकडे फिरकलाच नाही तर कारवाईची अपेक्षा कोणाकडून करणार, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. कृत्रिमरीत्या आंबे पिकविणाऱ्यावर दाखल होणार गुन्हानैसर्गिक आंबा पिकविण्यासाठी २० ते २१ दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे आंबा लवकर पिकविण्यासाठी व्यापारी कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन जे आंबे पिकविले जातात, ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. या तंत्रामुळे आंब्याचा केवळ रंग बदलतो. हिरवा आंबा पिवळा होतो मात्र त्याची चव बदलत नाही. ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या व्यापारी कृत्यावर अन्न व औषधी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.अक्षय्य तृतीयेपासून वाढणार आंब्याचे भावअवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका आंबे निर्माण होणाऱ्या गावांना बसल्यामुळे बाजारात आंब्याची आवक मंदावली आहे. २१ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे या पार्श्वभूमीवर २० एप्रिलपर्यंत आंब्याची आवक वाढण्याची अपेक्षा होत असली तरी यावर अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. उपलब्ध आंबा बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. मात्र फटका बसल्याने आवक कमी होते आहे. त्यात आंबा पिकविण्यासाठी पूर्वीची कॅल्शियम कार्बाईड वापरण्यास अन्न व औषधी प्रशासनाने मनाई केली आहे.