शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक द्रव्यामुळे फळांचा राजा झाला विषारी

By admin | Updated: April 21, 2015 00:06 IST

सर्व फळांचा राजा असलेल्या आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : अन्न व औषधी प्रशासन उदासीनसुरेश सवळे चांदूरबाजारसर्व फळांचा राजा असलेल्या आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आंब्याच्या सेवनापासून मनुषाला अनेक फायदे होत असतात. परंतु आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यामुळे आता फळांचा राजा विषारी झाला आहे.आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षांपासून आंब्याचे महत्त्व पटवून दिले होते. त्यासाठी गावाशेजारी नदी नाल्याच्या काठावरील शेतावर त्यांनी आम्रवृक्ष लावून ठेवले होते. तालुक्यातील अनेक गावे आमराईसाठी सर्व परिचित होते. या परिसरात मोठ्या आम्रवृक्षांचे वन मोठ्या प्रमाणात दिसत होते. परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या वृक्षतोडीमुळे ग्रामीण भागातील अनेक आमराया नामशेष झालेल्या दिसत आहेत. पूर्वी आंब्याला तणस, गवत किंवा झाडपाल्याचा वापर करुन पिकविले जात असायचे. त्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गुण टिकून राहत होते. परंतु आता झटपट पैसे कमविण्याच्या नादात फळविक्रेते आंबे पिकविण्यासाठी कृत्रिम पध्दतीने रासायनिक पावडरचा वापर करीत असल्याने मानवाला अनेक आजाराने घेरलेले दिसत आहे. त्यामुळे फळांचा राजा आंबा हा गुणकारी नसून विषारी झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात आंब्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. पाहुण्यासाठी पाहुणचार म्हणजे आंब्याच्या रसाची मेजवानी असते. विविध नावाने प्रसिध्द असलेल्या आंब्यांना विशेष मागणी असते. परंतु आंबा पिकविण्यासाठी रासायानिक कारपेटचा वापर करण्यात येतो. आंबे पिकविले जातात. याकडे अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या या मवाळ धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहे. या आंब्यांच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. निर्यातबंदी झाल्यामुळे बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आंब्याच्या किमती कमी झाल्याचे दिसते. मात्र आंबा ज्या नैसर्गिक पद्धतीने पिकवायला पाहिजे त्या पध्दतीने न पिकविता रासायानिक द्रव्य किंवा कारपेटचा वापर करुन आंबे पिकविले जातात. त्यामुळे बाजारपेठेत आंबे स्वस्त असली तरी प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या आंब्याच्या सेवनाने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे, हे त्यांच्या उदासीन कार्यप्रणालीवरुन दिसून येत आहे.ग्रामीण भागात रासायनिक प्रक्रिया करुन पिकविलेली फळे सर्रास पिकविली जात असताना आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी अशी फळे तपासणीसाठी इकडे फिरकलाच नाही तर कारवाईची अपेक्षा कोणाकडून करणार, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. कृत्रिमरीत्या आंबे पिकविणाऱ्यावर दाखल होणार गुन्हानैसर्गिक आंबा पिकविण्यासाठी २० ते २१ दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे आंबा लवकर पिकविण्यासाठी व्यापारी कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन जे आंबे पिकविले जातात, ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. या तंत्रामुळे आंब्याचा केवळ रंग बदलतो. हिरवा आंबा पिवळा होतो मात्र त्याची चव बदलत नाही. ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या व्यापारी कृत्यावर अन्न व औषधी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.अक्षय्य तृतीयेपासून वाढणार आंब्याचे भावअवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका आंबे निर्माण होणाऱ्या गावांना बसल्यामुळे बाजारात आंब्याची आवक मंदावली आहे. २१ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे या पार्श्वभूमीवर २० एप्रिलपर्यंत आंब्याची आवक वाढण्याची अपेक्षा होत असली तरी यावर अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. उपलब्ध आंबा बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. मात्र फटका बसल्याने आवक कमी होते आहे. त्यात आंबा पिकविण्यासाठी पूर्वीची कॅल्शियम कार्बाईड वापरण्यास अन्न व औषधी प्रशासनाने मनाई केली आहे.