शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

अवकाळी पावसाने खरिपावर रोगांचे संकट !

By admin | Updated: May 16, 2015 00:47 IST

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत.

तीन वर्षांची स्थिती : रबी हंगामानंतर जमीन तापत नसल्याने विपरीत परिणामगजानन मोहोड अमरावतीगेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत. मशागतीनंतर किमान दोन महिने जमीन पुरेशी तापायला हवी. परंतु अवकाळी पावसामुळे जमीन तापण्यास पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी मातीचा पोत खराब होत आहे. यामुळे किडी, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होऊ शकतो, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे २०१३ च्या मे अखेर ७६ मि.मी., २०१४ च्या मे अखेर १७० मि.मी. व यंदा १३ मेपर्यंत ९८ मि.मी. अवकाळी पाऊस पडला. यामुळे गहू, हरभरा व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम निसर्गासह, शेतजमिन, पशुपक्षी व मानवी जीवनावर होत आहे. निसर्ग नियमानुसार वर्षाचे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा असे तीन ऋतू आहेत. परंतु निसर्गाचे चक्रच सध्या बदलेले आहे. मे महिन्यांपर्यंत अवकाळीचे थैमान असते तर जून महिन्यात पेरणीच्या काळात दोन महिने पावसाचा पत्ताच नसतो. पावसाळ्यात उन्हाची तीव्रता जाणवते तर उन्हाळ्यात पावसाळ्याचा भास होतो. यामुळे पिकांचीही शाश्वती नाही. अवकाळी पाऊस मान्सूनसाठी बाधक उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस हा मोसमी वाऱ्यांसाठीही बाधक ठरणारा आहे. तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परंतु कमी-अधिक तापमान राहिल्यास त्याचा परिणाम पुढे सरकणाऱ्या प्रक्रियेवर होत असतो. इशान्य-नैर्ऋत्य पाऊस खेचण्यासाठी पोषक वातावरण लागते. अवकाळीने जमीन तापत नाही तसेच बाष्पीभवनही कमी प्रमाणात होते. त्यामुळे पाऊस लांबणीवर जातो. पावसाचे उशिरा होणारे आगमन ही त्याचीच प्रतिक्रिया असते. यालाच ऋतुमान बदल असेही आपण म्हणू शकतो. हा बदल अहितकारी आहे, अशी माहिती कृषितज्ज्ञांनी दिली. जमिनीच्या आरोग्यावर परिणामएप्रिलमध्ये शेतीची मशागत होऊन मे अखेरपर्यंत ती तापायला हवी. यामुळे जमिनीत असलेले सुप्तावस्थेतील कीटक बाहेर पडून नष्ट होतात. परंतु अवकाळीमुळे त्यांना अनुकूल परिस्थिती लाभत आहे. त्यामुळे पिकांवर बुरशी, अळयांचा प्रादुर्भाव वाढतो. वैशाखातील ऊन जमिनीला मिळणे आवश्यक आहे. परंतु गेल्या ३ वर्षांपासून एप्रिल व मे महिन्यांत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट असल्याने जमीन तापत नाही. त्यामुळे कीड नष्ट होत नाही. याचा जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.जमिनीलाही हवी विश्रांतीजमिनीच्या विश्रांतीचा काळ हा मार्च ते मे अखेरपर्यंत असतो. या काळात जमिनीचे तापमान वाढलेले असते. यामध्ये जर अवकाळी पाऊस पडला तर मातीमधील वेगवेगळ्या प्रकारचे अंडीकुंज नष्ट होत नाहीत. त्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. जमीन मशागतीला पुरेसा अवधी मिळत नाही. जमीन थंड-गरम होत राहिल्याने जमिनीचा पोत खराब होतो.