शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

नालीतील कचरा रस्त्यावर, वराहांचा उच्छाद

By admin | Updated: May 26, 2016 01:21 IST

महापालिकेचा अखेरचे टोक असलेला हा बडनेरा परिसर मागील १५ ते २० वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे.

सांडपाणी, नळाची कायम समस्या : पवन, गजानननगर, अंजू कॉलनीसह परिसरातील नागरिक त्रस्तअमरावती : महापालिकेचा अखेरचे टोक असलेला हा बडनेरा परिसर मागील १५ ते २० वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. आता कुठे विकास कामे व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र या परिसरात नालीची कायम समस्या आहे. कुठे नाल्या आहेत, तर कुठे नाहीत. सफाई कामगार नियमित येत नाहीत. नाल्या तुंबल्यात, सांडपाण्याची अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. उन्हाळ्यातच ही स्थिती आहे. पावसाळ्यात तर सांडपाण्याच्या गटारांमुळे वराहांचा उच्छाद असतो. याला नागरिक कंटाळलेत, दुर्गंधी व मच्छरांचा वाढता त्रास यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.परिसरातील नाल्यांची सफाई केल्यानंतर हा कचरा डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या काठावर बरेचदा टाकला जातो. त्यामुळे ही नवीन डोकेदुखी या परिसरात वाढीस लागली आहे. नागरिकांनी ही समस्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु अजून या समस्येच्या दुर्लक्ष केल्या गेल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नळ आहेत, परंतू नळ सोडण्याचे टायमींग नाही. रात्री १ वाजल्यानंतर नळ येतात. याला नागरिक वैतागले आहे. झोप सोडून पहिले पाणी भरावे लागते, नळ आला नाही तर याला पर्याय केवळ हापसी आहे. नागरिकांनी पाणी कोठून भरावे अशी स्थिती आहे. सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत त्यामुळे हजारो लिटर पाण्याच्या अपव्यय होतो. लेआऊटमधील ओपन स्पेस विकसित नाही, त्या ठिकाणी बगीच्या व्हायला पाहिजे, मुलांना खेळायला मैदान नाहीत. महिलांना योगाकरिता किंवा महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिकरीत्या एखादा कार्यक्रम करायचा असल्यास याठिकाणी सामूहिक व्हॉल असायला पाहिजे. मात्र या समस्येकडे नगरसेवक वा महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा नाहीत, बसायला बेंच नाहीत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असायला पाहिजे, ज्या ठिकाणी बेंच आहेत ते ज्येष्ठ नागरिकांच्या सोईचे नाहीत.अनेक पथदिवे नादुरुस्त आहेत. कित्येक दिवस दुरुस्त केली जात नाही. नगरसेवकांचे याकडे लक्ष द्यायला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. या परिसरात विजेच्या दाबाची समस्या आहे. कधी विजेचा कमी दाब, तर कधी उच्च दाब असतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील विजेची उपकरणे खराब झाली आहेत. तेथे रात्रीच्या वेळी परिसरात अवैध व्यवसाय चालतात, असा नागरिकांचा आरोप आहे.परिसरातील मैदानात असलेल्या मंदिराजवळ पथदिवा नाही. येथील दोन्ही फाटक तुटलेली आहेत. बरेचदा मेलेली वराह, कुत्रे या परिसरात आणून टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आरोग्याची समस्या निर्माण होते. गेल्या दोन दशकापासून दुर्लक्षित असलेल्या या परिसरातील विकासकामे अलीकडेच व्हायला लागली आहे. परंतु अनेक समस्या अजूनही बेदखल असल्याने नागरिक त्रस्त आहेत.