शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

नालीतील कचरा रस्त्यावर, वराहांचा उच्छाद

By admin | Updated: May 26, 2016 01:21 IST

महापालिकेचा अखेरचे टोक असलेला हा बडनेरा परिसर मागील १५ ते २० वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे.

सांडपाणी, नळाची कायम समस्या : पवन, गजानननगर, अंजू कॉलनीसह परिसरातील नागरिक त्रस्तअमरावती : महापालिकेचा अखेरचे टोक असलेला हा बडनेरा परिसर मागील १५ ते २० वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. आता कुठे विकास कामे व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र या परिसरात नालीची कायम समस्या आहे. कुठे नाल्या आहेत, तर कुठे नाहीत. सफाई कामगार नियमित येत नाहीत. नाल्या तुंबल्यात, सांडपाण्याची अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. उन्हाळ्यातच ही स्थिती आहे. पावसाळ्यात तर सांडपाण्याच्या गटारांमुळे वराहांचा उच्छाद असतो. याला नागरिक कंटाळलेत, दुर्गंधी व मच्छरांचा वाढता त्रास यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.परिसरातील नाल्यांची सफाई केल्यानंतर हा कचरा डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या काठावर बरेचदा टाकला जातो. त्यामुळे ही नवीन डोकेदुखी या परिसरात वाढीस लागली आहे. नागरिकांनी ही समस्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु अजून या समस्येच्या दुर्लक्ष केल्या गेल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नळ आहेत, परंतू नळ सोडण्याचे टायमींग नाही. रात्री १ वाजल्यानंतर नळ येतात. याला नागरिक वैतागले आहे. झोप सोडून पहिले पाणी भरावे लागते, नळ आला नाही तर याला पर्याय केवळ हापसी आहे. नागरिकांनी पाणी कोठून भरावे अशी स्थिती आहे. सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत त्यामुळे हजारो लिटर पाण्याच्या अपव्यय होतो. लेआऊटमधील ओपन स्पेस विकसित नाही, त्या ठिकाणी बगीच्या व्हायला पाहिजे, मुलांना खेळायला मैदान नाहीत. महिलांना योगाकरिता किंवा महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिकरीत्या एखादा कार्यक्रम करायचा असल्यास याठिकाणी सामूहिक व्हॉल असायला पाहिजे. मात्र या समस्येकडे नगरसेवक वा महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा नाहीत, बसायला बेंच नाहीत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असायला पाहिजे, ज्या ठिकाणी बेंच आहेत ते ज्येष्ठ नागरिकांच्या सोईचे नाहीत.अनेक पथदिवे नादुरुस्त आहेत. कित्येक दिवस दुरुस्त केली जात नाही. नगरसेवकांचे याकडे लक्ष द्यायला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. या परिसरात विजेच्या दाबाची समस्या आहे. कधी विजेचा कमी दाब, तर कधी उच्च दाब असतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील विजेची उपकरणे खराब झाली आहेत. तेथे रात्रीच्या वेळी परिसरात अवैध व्यवसाय चालतात, असा नागरिकांचा आरोप आहे.परिसरातील मैदानात असलेल्या मंदिराजवळ पथदिवा नाही. येथील दोन्ही फाटक तुटलेली आहेत. बरेचदा मेलेली वराह, कुत्रे या परिसरात आणून टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आरोग्याची समस्या निर्माण होते. गेल्या दोन दशकापासून दुर्लक्षित असलेल्या या परिसरातील विकासकामे अलीकडेच व्हायला लागली आहे. परंतु अनेक समस्या अजूनही बेदखल असल्याने नागरिक त्रस्त आहेत.