शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जिल्हा बँकेची होणार चौकशी

By admin | Updated: October 18, 2015 00:40 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा यंदा कर्जाचे पुनर्गठन न केल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नसल्याचा मुद्दा गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात ...

पालकमंत्र्यांचे आदेश : कर्ज वाटपात अनियमितताअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा यंदा कर्जाचे पुनर्गठन न केल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नसल्याचा मुद्दा गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी ताणून धरला. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले व अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ना.प्रवीण पोटे यांनी दिले. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेत यंदाच्या हंगामात कर्जवाटपात भेदभाव झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी डीपीसीच्या बैठकीत केला. जिल्हा बँकेला ५६३ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना यंदा ३८३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले व शासनाने हमी घेतलेल्या ९१ कोटी रुपयांची उचल केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले नाहीत. १८० कोटीचे कर्जवाटप अद्याप बाकी आहे. पुनर्गठनाच्या १३२ कोटींपैकी ९१ कोटींची उचल केली. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. शेतकरी हित साधले जात नसल्याने पालकमंत्र्यांनी या बँकेच्या चौकसीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधक याची चौकसी करणार आहे व चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री पोटे यांनी डीपीसी बैठकीनंतर गुरुवारी सायंकाळी आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.जिल्हा नियोजन समितीच्या २१७ कोटी रुपयाच्या आराखड्यातील वितरित निधीचा योग्य विनियोग उर्वरित आर्थिक वर्षात केल्यासच त्यांना पुढील निधी देता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चौकसीला सामोरे जाण्यास तयार - बबलू देशमुखहा राजकीय स्टंट आहे. जिल्हा बँकेने १३२ कोटी रूपयांचे पुनर्गठन केले आहे. शासनाने उशिरा प्रक्रिया सुरू केली ज्यांची मागणी होती त्या शेतकऱ्यांचे पुनर्गठन केले आहे. ज्यांची मागणी नाही त्यांच्यावर जबरदस्ती कसी करणार? ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज भरले त्यांना अधिकचे कर्ज देण्यात आले. बँकेचे डिपॉझीट १३५० कोटी व कर्जाचा लक्ष्यांक ५६३ कोटी, ४४० कोटीचे यंदा करण्यात आले आहे. २०० कोटी ईतर कर्ज वाटप आहे. नाबार्ड व आरबीआयच्या निर्देशाने अन्य गुंतवणूक करण्यात आली ऐवढे झाल्यावर नवीन कर्ज देण्यासाठी पैसेच नाही. ३०० कोटीचे फिरते भांडवल आहे ते केव्हाही काढू शकतात. ५६३ कोटीचा लक्ष्यांक साधने शक्य नाही असे अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. हे सरकार आल्यावर यापूर्वी ही चौकसी करण्यात आली. कुठल्याही चौकसीला सामोरे जाण्यास तयार आहो असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.