शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भूदान मंडळाच्या कामात शासनाचा खोडा

By admin | Updated: May 22, 2016 00:02 IST

महसूल विभागाने मागील महिन्यात ७ सदस्यीय समितीचे गठन करून यापूर्वीच्या भूदानयज्ञ मंडळाला निष्फळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरी समिती नियुक्त : शासन काय साध्य करणार !अमरावती : महसूल विभागाने मागील महिन्यात ७ सदस्यीय समितीचे गठन करून यापूर्वीच्या भूदानयज्ञ मंडळाला निष्फळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही समिती भूदानसी यापूर्वी कधी नाळ जुळलीच नसल्याने यामधून कितपत साध्य होईल, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शासनाद्वारा १७ फेब्रुवारी २०१६ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ व मध्यप्रदेश भूदानयज्ञ अधिनियम १९३५ या कायद्याखालील जमिनीसंदर्भातील शासनाच्या भूमिका ठरविण्यासाठी व अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठित केली आहे. या समितीत सदस्य म्हणून वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, वने व महसूल विभागाचे उपसचिव, पुणे, नाशिक व नागपूर येथील विभागीय आयुक्तांचा या समितीत समावेश आहे. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान यज्ञात मिळालेली ही जमीन खासगी मालमत्ता असून शासनाला या जमिनीशी काही देणे-घेणे नाही. मुळात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने या जमिनीचा भोगवटदार वर्ग २ बदलून विक्री होत असल्याचे समजते. केव्हा सादर होणार अहवाल ?अमरावती : शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या कार्यकाळ हा तीन महिन्यांचा आहे. १७ मे २०१६ रोजी या समितीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यातील महिन्यात समितीची एकही बैठक झालेली नाही. नवनियुक्त समितीचे सचिवस्तरावर सर्व अधिकारी एसीत बसणारे आहे. याची समितीची जमिनीशी कधी नाळ जुळलीच नाही. तपत्या उन्हात हे अधिकारी भूदान व ग्रामदान जमिनीचा शोध कसा घेतली की टेबलवर बसून शासनाला अहवाल सादर करतील, यावर शंकाच आहे.समिती बेकायदेशीर, मंडळाचा आरोपभूमिहीन व शेतमजुरांनाच ही जमीन मिळाली पाहिजे, असा स्वतंत्र नियम भूदान यज्ञ मंडळाने केला आहे व या कायद्याला शासनाची मान्यता आहे. त्यामुळे शासनस्तरावर भूदान जमिनीचा निर्णय घ्यायचा अधिकार शासनास नाही, असे असताना ज्या भूदान मंडळाची जमीन आहे. त्या मंडळाला विश्वासात न घेता परस्पर शासनस्तरावर समिती नियुक्त करणे गैर असल्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. कार्यकाळ संपला तरी समितीची बैठक नाही१६ फेब्रुवारीला गठित समितीचा तीन महिन्यांचा कार्यकाळ हा १७ मे रोजी संपुष्टात आहे. दरम्यान समितीची एकही बैठक झाली नाही. भूदान जमिनीसंदर्भात धोरण ठरविण्यासाठी शिफारसी या समितने केल्या नाही. त्यामुळे समितीचे गठण हा शासनाचा ‘फार्स’ ठरला आहे. भूदानची जमीन ही खासगी मालमत्ता असल्याने या जमिनीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला नाही. मंडळाला विचारात न घेता शासनाने परस्पर नियुक्त केलेली समिती नियमबाह्य आहे. - आचार्य हरिभाऊ वेरुळकर,अध्यक्ष, भूदान यज्ञ, मंडळ